ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी उद्या होणाऱ्या बहुमताच्या चाचणीत मतदान करण्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यांनी यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
मलिक आणि देशमुख सुप्रीम कोर्टात यासंदर्भातील याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यसभा निवडणूक आणि विधान परिषद निवडणुकी वेळीही अशीच याचिका मलिक आणि देशमुखांकडून दाखल करण्यात आली होती. पण त्यावेळी सुप्रीम कोर्टाकडून दोघांनाही मतदानाची परवानगी नाकारली होती. आत पुन्हा याचिका दाखल केल्याने सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे.