ऑनलाईन टीम/तरारून भारत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काल फेसबुक लाईव्ह येत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यांनंतर विविध पक्षातील नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही एक पोस्ट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता उपरोधिक टोला लगावला आहे. केली आहे.
राज ठाकरे यांनी राज्यात सुरु असलेल्या सत्ता संघर्षावर अखेर मौन सोडलं आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करत नाव न घेता उद्धव ठाकरेंना उपरोधिक टोला लगावला आहे. ज्या दिवशी माणूस आपल्या नशिबालाच आपले वैयक्तिक कर्तव्य मानू लागतो, त्या दिवसापासून ऱ्हासाकडे प्रवास सुरू होते, असं ट्विट राज ठाकरेंनी केलीय. राज ठाकरेंनी हे ट्विट हिंदीतून केलं असून, खाली स्वतःची स्वाक्षरीसुद्धा आहे. राज ठाकरेंच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हे ट्विट करण्यात आलं आहे.
काय आहे राज ठाकरेंचं ट्विट
राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,”एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो.” राज ठाकरे यांनी तिन्ही भाषेत ही पोस्ट केली आहे.