राजापूर-हसोळतर्फे सौंदळमधील घटना : तिघांविरोधत गुन्हा दाखल
शहर वार्ताहर/राजापूर
फायनान्स कंपनीकडून कर्जफेडीसाठी तगादा लावल्याने राजापूर तालुक्यातील हसोळ तर्फे सौंदळ मुस्लिमवाडी येथील तरूण अजीम कादर नाईक यांने विष घेऊन जीवन संपवल्याची घटना नुकतीच घडली. या बाबत त्यांचे बंधू रियाज नाईक यांनी राजापूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कर्जाच्या हप्तासाठी तगादा लावणाऱ्या फायनान्स कंपनीच्या तिघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजिम यांनी एप्रिल 2021 मध्ये जेसीबी खरेदीसाठी छोला मंडल फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. हप्त्यापोटी महिन्याला 48 हजार 371 नुसार तीन हप्ते थकले होते. हे हप्ते भरण्याबाबत कायदेशीर मार्ग न अवलंबता मानसिक त्रास देत कंपनीचे अधिकारी दिनेश बाबर, अनिरूद्ध माने व सामी यांनी अझीम याला तत्काळ हप्ते भरण्याचा तगादा लावला होता. 20 जून रोजी सकाळी 8 वा. छोला मंडलचे दिनेश बाबर व अन्य दोन लोक घरी आले. अजीमला कारमधून घेवून गेले व परत आले. त्यानंतर जेसीबी असलेल्या नानीवडे गावी गेले. तेथून दिनेश, अनिरुध्द व अजिम परत आले व सामी जेसीबीजवळ थांबला होता. दरम्यान अजीम मोठ्याने ओरडल्याचा आवाज आला म्हणून तेथ गेलो असता फायनान्स कंपनीच्या दोन लोकांनी अजीमला गाडीत बसवून गेटजवळ आणले होते. यावेळी दिनेश याने अजीम विष प्यायल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी आम्हाला घरी सोडले व काही न विचारपूस करता निघून गेले. हप्त्यासाठी अतोनात मानसिक छळ केल्याने अजीमने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात येत आहे.
हे ही वाचा : अर्जुन यादव खूनाच्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार जेरबंद
छोला मंडल फायनान्स कंपनीच्या त्रासाला कंटाळून तबेल्यात ठेवलेले गवत मारायचे औषध प्यायल्याचे अजीमने सांगितल्याचे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे. यानुसार राजापूर पोलीस स्थानकात छोला मंडल कंपनीचे दिनेश बाबर, अनिरूद्ध माने व सामी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम. एल. मोळे करीत आहेत.