शनिवार बाजारचा दिवस असूनही व्यापाऱयांनी दिला पाठिंबा
प्रतिनिधी/ बेळगाव
केंद्र सरकारने कडधान्ये तसेच जीवनावश्यक वस्तूंवर 5 टक्के जीएसटी लागू केला. त्या विरोधात बेळगाव येथील एपीएमसी, रविवारपेठ आणि इतर व्यापाऱयांनी शनिवारी पूर्ण व्यवहार बंद ठेवून निषेध करण्याचा निर्णय घेतला. त्याला सर्वच व्यापारीवर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शंभर टक्के बंद करून सरकारने लागू केलेला जाचक जीएसटी मागे घेण्याची मागणी सर्वांनीच व्यक्त केले.
केंद्र सरकारने आहार, कडधान्ये यावर 5 टक्के लावलेला कर सर्वसामान्य जनतेच्या खिशातूनच घेतला जाणार आहे. व्यापारी असो किंवा इतर कोणताही घटक, तो नुकसानीमध्ये काम करणार नाही. त्यामुळे साहजिकच याचा फटका ग्राहकाला बसणार आहे. तेव्हा याचा सारासार विचार केंद्र सरकारने करावा, अशी येथील व्यापारीवर्गाची मागणी आहे.
क्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता
बेळगाव बाजारपेठ ही सीमाभागामध्ये वसलेली आहे. बेळगाव जिल्हय़ाबरोबरच महाराष्ट्र-गोवा येथील व्यापारी आणि ग्राहकही खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे बेळगाव बाजारपेठेत मोठी उलाढाल होत असते. मात्र, केंद्र सरकारने जर अशा प्रकारे जाचक जीएसटी लागू केला तर त्याचा परिणाम क्यवसायावर होणार आहे. तसेच सर्वसामान्य जनतेवर त्याचे विपरित परिणाम होणार आहेत. याची जाणीव सरकारला आहे की नाही? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
एकतर यापूर्वीपासूनच जनता विविध समस्यांना तोंड देत आहे. कोरोना, त्यानंतर महागाईशी लढा देताना साऱयांच्याच नाकी नऊ येत आहेत. पेट्रोलच्या वाढीव दराचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. आता जीएसटीमध्ये वाढ करून पुन्हा जीवनावश्यक वस्तू महाग होणार आहेत. तेव्हा सरकारने घेतलेला निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी व्यापारीवर्गाची मागणी आहे.
मोठय़ा व्यापारी कंपन्यांना मुभा दिल्यामुळे भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता
सध्या सर्वच शहरांमध्ये विविध व्यापारी कंपन्या दाखल होत आहेत. त्या ग्राहकांना आकर्षित करत आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी होलसेल विपेत्यांना फटका बसू लागला आहे. याचबरोबर शहर व उपनगरात असलेल्या किरकोळ दुकानदारांनाही त्याची झळ बसली आहे. सरकारने अशाप्रकारे मोठय़ा व्यापारी कंपन्यांना मुभा दिल्यामुळे भविष्यात मोठा धोका निर्माण होणार आहे. आता जीएसटी लागू केल्यानंतर महागाई वाढणार आहे. मात्र, या मोठय़ा व्यापारी कंपन्या इतर आमिषे दाखवून ग्राहकांना आकर्षित करून आपला व्यवसाय दुप्पट करणार आहेत. तेव्हा केंद्र सरकारने सारासार विचार करावा आणि जाचक जीएसटी रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली.
जीएसटी मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन
जीएसटी लागू केल्यामुळे होलसेल दुकानामध्ये आणखी 2 ते 3 कामगारांची नियुक्ती करून त्यांनाही पगार द्यावा लागणार आहे. त्यामुळे जीएसटी आणि त्या कामगारांचा पगारही विक्री केलेल्या मालातूनच काढावा लागणार आहे. त्यामुळे वाढविण्यात आलेला हा जीएसटी थेट ग्राहकांच्या खिशालाच कात्री लावणारा आहे. त्यामुळे जनताही आता रस्त्यावर उतरणार आहे. आम्ही सध्या सांकेतिक स्वरुपात हा बंद केला आहे. मात्र, जीएसटी मागे न घेतल्यास याहून अधिक तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा देण्यात आला आहे.
रविवारपेठने घेतला मोकळा श्वास
बेळगावातील रविवारपेठ आणि बाजारपेठ नेहमी गजबजलेली असते. ग्राहकही मोठय़ा संख्येने खरेदीसाठी दाखल होत असतात. मात्र, सर्वच व्यापारीवर्गाने संघटितपणे बंद पुकारल्यामुळे रविवारपेठमध्ये शुकशुकाट पसरला होता. बऱयाच दिवसांनंतर रविवारपेठने मोकळा श्वास घेतला. शनिवार असूनही कोणीही दुकान उघडले नाही. याचबरोबर खरेदीसाठी ग्राहकही आले नाहीत. त्यामुळे व्यापारीवर्गाने पुकारलेला बंद पूर्णपणे यशस्वी झाला आहे. सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल व्यापारीवर्गाने आभार मानले आहेत.
एपीएमसी व्यापारीवर्गाचा आजही बंद
एपीएमसी व्यापारीवर्गाने जीएसटीच्या विरोधात दोन दिवस बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन त्यांनी बंद करण्याबाबत माहिती दिली होती. त्यानुसार शनिवारी एपीएमसीमधील आहार, कडधान्ये विक्री करणाऱया व्यावसायिकांनी पूर्णपणे व्यवहार बंद ठेवला. रविवारीही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.