सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास 5 हजारचा दंड
कंग्राळी बुद्रुक : कंग्राळी बुद्रुक-शाहूनगर रस्त्याच्या दोन ठिकाणी टाकण्यात आलेले कचऱयाचे ढिगारे ग्रा. पं. ने जेसीबीद्वारे स्वच्छ केल्यामुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. नूतन ग्रा. पं. अध्यक्षा पूनम पाटील, उपाध्यक्षा यल्लोजी पाटील व इतर सदस्यांनी ‘एक पाऊल स्वच्छते’कडे या घोषवाक्याप्रमाणे स्वच्छता मोहीम राबविल्यामुळे पर्यावरणप्रेमी, प्रवासी वर्ग व वाहनधारकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कंग्राळी बुद्रुक रस्त्याच्या दोन ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकून सर्वत्र दुर्गंधीयुक्त वातावरण तयार केले होते. रस्त्यावरून जाताना नाक मुठीत धरून नागरिकांना जावे लागत होते. शनिवारी ग्रा. पं. ने दोन्ही ठिकाणचे कचऱयाचे ढिगारे हटवून रस्ता कचरामुक्त केला आहे. यानंतर रस्त्याकडेला कचरा टाकणाऱयाला 5000 रुपये दंड तसेच कचरा टाकताना पकडून देणाऱयास 1000 रुपये बक्षीस जाहीर केले, अशी नामी शक्कल लढविल्यामुळे कचरा टाकणाऱयांना वचक बसला आहे.
ग्रा. पं. च्या या निर्णयामुळे ग्रा. पं. चे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. यावेळी ग्रा. पं. अध्यक्षा पूनम पाटील, उपाध्यक्ष यल्लोजी पाटील, सदस्य सुरेश राठोड, नवनाथ पुजारी, जयराम पाटील, दत्ता पाटील, सुप्रिया कोळी, भारता पाटील, अर्चना पठाणे, सुचिता कोळी उपस्थित होते.