नवी दिल्ली / वृत्तसंस्था
प्रशासकीय अधिकारी प्रणय वर्मा यांची शुक्रवारी बांगलादेशमधील भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागिदारी लक्षात घेता ही नियुक्ती अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. वर्मा हे भारतीय परराष्ट्र सेवेचे 1994 च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते सध्या व्हिएतनाममध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत. ते विक्रम दोराईस्वामी यांची जागा घेतील. दोराईस्वामी ब्रिटनमधील भारतीय राजदूत म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. ब्रिटनमधील भारताच्या उच्चायुक्त गायत्री इस्सार कुमार 30 जून रोजी निवृत्त झाल्याने राजदुतांच्या जबाबदारीत बदल करण्यात आला आहे.