भाजपच्या विविध मोर्चांचे ध्येय
प्रतिनिधी/ पणजी
देशाच्या स्?वातंत्र्याचा अर्थात आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी भाजपाच्या विविध मोर्चातर्फे राज्यात विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ‘हर घर तिरंगा’च्या माध्यमातून संपूर्ण राज्य तिरंगामय करण्याचेही ठरविण्यात आले असून त्यासाठी पक्षाचे पदाधिकारी, आमदार, मंत्री आणि कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
भाजपच्या विविध मोर्चांच्या प्रमुखांतर्फे शनिवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. त्यावेळी वासुदेव मेंग गावकर, उदय प्रभुदेसाई, भारती बांदेकर, सिद्धेश पेडणेकर, गिरीश उसकईकर, अर्जुन माळगावकर, हैदर शहा, अँथनी बार्बोझा आदी मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आझादी का अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा उपक्रम यशस्?वी करण्यासाठी सर्व मोर्चांनी पुढाकार घेतला असून या दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारची विकासकामे व योजनांनी माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यात येतील, असे यावेळी सांगण्यात आले.
राज्यातील सर्व घरे, दुकाने, आस्थापने, बँका, सहकारी-शेतकरी संस्?था आदींनी तिरंगा लावावा, असे आवाहन किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव मेंग गावकर यांनी केले. युवा मोर्चातर्फे राज्यातील 36 मतदारसंघात तिरंगा रॅली काढण्यात येईल, तसेच प्रत्येक मतदारसंघात 6 हजारांपेक्षा अधिक तिरंग्यांचे वाटप करण्यात येणार आहे. राज्यातील चार ठिकाणी लोकांसाठी विनामूल्य तिरंगा उपलब्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, येत्या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या संकल्पनेतील स्?वयंपूर्ण चतुर्थी बाजार यशस्?वी करण्यासाठी राज्यातील स्?वयंसाहाय्य गट, महिला लघुउद्योजकांनी पुढे यावे, असे आवाहन भारती बांदेकर यांनी केले.
गेल्या महिन्यात पाटणा-बिहार येथे झालेल्या देशातील सर्व मोर्चांच्या परिषदेची माहिती देण्यात आली. या परिषदेला गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, पी. एल. संतोष अशा अनेक दिग्गजांचे मार्गदर्शन लाभल्याचे यावेळी सांगण्यात आले.