प्रतिनिधी / बेळगाव
मेंदू निष्क्रिय झालेल्या एका 27 वषीय तरुणाने केलेल्या अवयवदानामुळे चौघा जणांना जीवदान मिळाले आहे. गुरुवारी धारवाडहून त्या तरुणाचे अवयव झिरो ट्रॉफिकमधून बेळगावला आणण्यात आले. अशा घटनांमधून अवयवदानाबद्दल व्यापक जागृतीही होत आहे.
धारवाड येथील एसडीएम इस्पितळात उपचार घेणाऱया 27 वषीय तरुणाचा मेंदू निष्क्रिय झाला. त्यामुळे डॉक्टरांनी त्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना अवयवदानाबद्दल माहिती दिली. तुमच्या एका निर्णयाने चौघा जणांना जीवदान मिळते असे सांगून त्यांना अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्यावेळी कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला.
त्या तरुणाचे हृदय व मूत्रपिंड झिरो ट्रॉफिकमधून बेळगावला आणण्यात आले. तर एक मूत्रपिंड एसडीएम इस्पितळात उपचार घेणाऱया रुग्णाला प्रत्यारोपण करण्यात आले. विमानाने लिव्हर बेंगळूरला पाठविण्यात आले. त्या तरुणाच्या कुटुंबीयांनी नाव गुप्त ठेवण्याची विनंती केल्याचे सांगण्यात आले.
केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळात दाखल झालेल्या 50 वषीय व्यक्तीला त्या तरुणाचे हृदय प्रत्यारोपण करण्यात आले. डॉ. रिचर्ड सालढाणा, डॉ. मोहन गाण, डॉ. आनंद वाघराळी यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया केली तर डॉ. एस. आय. नेली, डॉ. मल्लिकार्जुन करिशेट्टी (खानपेठ) आदींच्या पथकाने गरजू रुग्णावर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. इस्पितळाचे वैद्यकीय संचालक डॉ. एम. व्ही. जाली यांनी हुबळी-धारवाड व बेळगाव पोलिसांचे अभिनंदन केले आहे.