सायंकाळी झालेल्या पावसामुळे सार्वजनिक मिरवणुकीत कार्यकर्त्यांचा हिरमोड : रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर शहरासह तालुक्मयात गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. मात्र बुधवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकीत कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता.
शहरात सकाळी सातपासून गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देत वाद्यांच्या व फटाक्मयांच्या आतषबाजीत घरगुती गणपती घेऊन जात होते. दुपारी एक वाजेपर्यंत घरोघरी गणपतीचे पूजन करण्यात आले. सायंकाळी चारनंतर सार्वजनिक गणपतीच्या मंडळांनी गणेशमूर्ती घेऊन जाण्यासाठी पारंपरिक वाद्यांसह मिरवणुकीला प्रारंभ केला होता. मात्र सायंकाळी पाच वाजता झालेल्या जोरदार पावसामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. घाईगडबडीने रात्री उशिरापर्यंत मंडपात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येत होती.
शहरात पोलीस ठाणे, जिल्हा पंचायत, शिक्षण खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, हेस्कॉम कार्यालयासह विविध ठिकाणी सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्याचबरोबर शहरातील बाल मंडळ देसाई गल्ली, शिवाजी गणेश मंडळ स्टेशन, विद्यानगर, दुर्गानगर, केंचापूर गल्ली, चौराशी मंदिर, बाजारपेठ, बुरुड गल्ली, रुमेवाडी क्रॉस, निंगापूर गल्ली, महालक्ष्मी मंदिर, शिवाजीनगर या ठिकाणीही सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली. शहरात सायंकाळी उशिरापर्यंत विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती.