सावंतवाडी / प्रतिनिधी –
झाराप पत्रादेवी बायपासवर नेमळे गावकर कुंभारवाडी येथे टाटा टियागो कार पलटी झाली. यात कारचे नुकसान झाले मात्र , कुठच्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही . कारचालक कुडाळच्या दिशेने गोव्याकडे जात आसताना चालकाचा ताबा सुटल्याने कार डिवायडरला आदळून महामार्गाच्या कडेला साचलेल्या पाण्यात पलटी झाली . कार डीवायडरला आदळता क्षणी कारमध्ये असलेल्या एअर बॕग खुलल्यामुळे कार चालक वाचला. यावेळी ,स्थानिकांनी कारमधून कारचालकाला सूरक्षित बाहेर काढले .