वार्ताहर / कणकुंबी
कणकुंबी हा भाग खरंतर पृथ्वीवरचा स्वर्गच आहे. अशा पद्धतीचे वातावरण किंवा निसर्ग लाभला हे आपलं नशीब आहे. आज बरेच लोक सिमेंटच्या जंगलात राहतात. पण या भागातील सगळे लोक नैसर्गिक जंगलात राहतात. त्यामुळे सर्वदृष्टीने हा भाग एक वरदानच आहे. पश्चिम घाटाचे संरक्षण करण्याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे. यासाठी आम्ही तुमच्या माध्यमातून प्रयत्नशील आहोत, असे विचार संस्थेचे उपाध्यक्ष राहुल गोडसे यांनी पुणे येथील एसईबीसी व हिमालया वेलनेस या संस्थेच्यावतीने कणकुंबी येथे वृक्षारोपणप्रसंगी व्यक्त केले.
यावषी ‘आšाादी का अमृतमहोत्सव’ या उपक्रमांतर्गत एक लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. पुणे परिसरामध्ये जवळपास 75 हजार झाडे लावण्यात आली आहेत. बेळगाव विभागामध्ये 15 हजार लावण्याचे उद्दिष्ट असून उर्वरित 10 हजार झाडे पारवाड परिसरामध्ये लावण्यात येणार आहेत. आपल्या संस्थेच्यावतीने ‘झाडे लावा झाडे जगवा’ या माध्यमातून गेली अनेक वर्षे पर्यावरणासंबंधी जागृत करण्याचे काम करत असल्याची माहिती पुण्याच्या एसईबीसी संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीनाथ कवडे यांनी दिली. सोसायटी फॉर इनव्हायरमेंट अँड बायोडायव्हर्सिटी कंजर्वेशन या पुणे येथील संस्थेच्या माध्यमातून शतावरी इको रिसॉर्ट येथे जवळपास 5000 रोपे लावण्यात आली. प्रारंभी कणकुंबी ग्रामपंचायत रमेश खोरवी, विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय नंदिहळ्ळी, माऊलीदेवी विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष राजाराम गावडे, जांबोटी विभागाचे जि. पं. माजी सदस्य जयराम देसाई व लोककल्प फाऊंडेशनच्या सी. एस. आर. मॅनेजर मालिनी बाली आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर लोककल्प फाऊंडेशनतर्फे संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीनाथ कवडे व उपाध्यक्ष राहुल गोडसे यांना भेटवस्तू देऊन व शाल अर्पण करून त्यांचा सत्कार करण्यात आला. तर एसईबीसी संस्थेतर्फे उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
कणकुंबी येथे येथील शतावरी इको रिसॉर्ट आणि बेळगावच्या लोककल्प फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. श्रीनाथ कवडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शतावरी इको रिसॉर्टचे संचालक किरण गावडे होते.
यावेळी विजय नंदिहळ्ळी, जयराम देसाई व किरण गावडे यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देणारे विचार व्यक्त केले. याप्रसंगी वनदेवी मल्टिपर्पज सोसायटीचे संस्थापक लक्ष्मण कसार्लेकर तसेच वेदांत फाऊंडेशनचे अध्यक्ष सतीश पाटील, अतिवाड हायस्कूलचे मुख्या. एम. वाय. पाटील, बी. डी. पाटील, गोविंद काळसेकर, सुधीर रेडकर तसेच कणकुंबी गावातील नागरिक व जांबोटी आणि कणकुंबी विद्यालयाचे शिक्षक वर्ग व माऊली विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थी व पाहुण्यांच्या हस्ते विविध जातींच्या रोपांची लागवड केली. सूत्रसंचालन सुनील चिगुळकर यांनी केले. जांबोटी विद्यालयाचे मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी आभार मानले. वृक्षारोपण उपक्रमात भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एसईबीसी संस्थेतर्फे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोककल्प फाऊंडेशन, शतावरी इको रिसॉर्ट व इतर संस्था प्रमुखांनी परिश्रम घेतले..