कसबा बीड / प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील कसबा बीड येथे नवीन होणाऱ्या सुसज्य ग्राम सचिवालय इमारतीचे आज पाया पूजन करण्यात आले. ग्रामपंचायत सरपंच दिनकर गावडे व उपसरपंच श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते हा पाया पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी तंटामुक्त अध्यक्ष शामराव सूर्यवंशी यांनी कसबा बीड गावात ग्राम सचिवालय निर्माण व्हावी,अशी सर्व ग्रामस्थांची इच्छा होती. पन्नास वर्षांपूर्वीची असणारी ही जुनी इमारत हिचे निर्लेखन करणे गरजेचे होते. पण शासन स्तरावरती अनेक अडचणी येत होत्या. त्या सर्व अडचणीवर मात करून तयार होणाऱ्या नवीन सज्ज इमारतीमध्ये टेलिफोन ऑफिस, तलाठी कार्यालय, मीटिंग हॉल अशा विविध सेवेसाठी नवीन इमारतीची निर्मिती होणार आहे. त्यासाठी लागणारा फंड ग्रामपंचायत स्वनिधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच आमदार फंडातून निधीच्या माध्यमातून ही इमारत सर्व ग्रामस्थांच्या साथीने निर्माण होणार आहे असे ते म्हणाले. ग्रामपंचायत सरपंच दिनकर गावडे यांनी आपण सरपंच सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने झालो आहे,त्यामुळे सर्वांच्या मार्गदर्शनाने व साथीने ही इमारत पूर्ण करू असे विश्वासाने सांगितले.
यावेळी सरपंच दिनकरराव गावडे, उपसरपंच श्रीनिवास पाटील, ग्रामसेवक महेश खाडे,माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, माजी सरपंच सत्यजित पाटील, सर्जेराव तिबिले, सर्जेराव सूर्यवंशी,रवींद्र पाटील, मुकुंदराव पाटील, तंटामुक्त अध्यक्ष शामराव सूर्यवंशी, रघुनाथ वरुटे, संदीप सुतार, भगवान सूर्यवंशी, वैशाली पाटील, वैशाली सूर्यवंशी, राजश्री बिडकर, मयूर वरूटे,अनिल भाट, ग्रामपंचायत चे सर्व सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, सर्व ग्रामस्थ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना ग्रामसेवक महेश खाडे व आभार दिनकरराव सूर्यवंशी यांनी केले.