Sawantwadi city has no guardian – Rupesh Raul
स्वच्छ सुंदर सुसंस्कृत सावंतवाडी अशी सावंतवाडीची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. संस्थानकालीन सावंतवाडी शहर या शहराचे भूषण असलेले मोती तलाव व त्याचा कठडा कोसळला आहे. खरंतर, सावंतवाडी शहराला सध्या कोणी वालीच नाही. हे शहर नेतृत्वहीन शहर झाले आहे . पालिका प्रशासन पूर्णपणे झोपा काढते आहे. मोती तलावाचा गाळ उपसा ही चुकीच्या पद्धतीने झालेली प्रक्रिया आणि मोती तलावाचा कठडा कोसळला याला पालिका प्रशासन जबाबदार आहे . सावंतवाडी शहरात गटार साफसफाई तसेच स्वच्छता रस्त्यांची डागडुजी आधी सर्वच अलबेल आहे . पालिका प्रशासन झोपले ते जागं कधी होईल असा सवाल उद्धव ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी स्पष्ट केले आहे .
सावंतवाडी / प्रतिनिधी