म्हैसाळ वार्ताहर
मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांची सतत पाणी सोडण्याची मागणी पहाता शेवटी शेतकऱ्यांची पाण्याची गरज ओळखून सांगली जिल्हयाचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री नामदार डॉ.सुरेश (भाऊ) खाडे यांनी म्हैसाळ आवर्तन सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.अनेक वेळा पाणी सुरू करण्यासाठी मोटारीचे बटन थांबण्यासाठी राजकीय नेत्यात स्पर्धा असते मात्र यावेळी प्रथमच सर्वसामान्य शेतकऱी आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते म्हैसाळ आवर्तनाची सुरुवात करण्यात आली हे विशेष!
अत्यंत साध्या पध्दतीने कोणत्याही प्रकारे गाजावाजा न करता म्हैसाळ पंप हाऊस येथे सकाळी अकरा वाजता पंचक्रोशीतील आणी पूर्व भागातील सर्वसामान्य शेतकरी आणी कार्यकर्ते यांच्या हस्ते पंपाचे पूजन करून म्हैसाळ आवर्तनाचा शुभारंभ करण्यात आला .यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी जाधव साहेब, साळे साहेब, बाबासाहेब सातपुते बेडगचे सरपंच उमेश पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस धनंजय कुलकर्णी,विजय पाटील,किसान मोर्चा चे संजय लिंबीकाई, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग घोरपडे ,दौलतराव कांबळे ,माजी जि प सदस्य मनोजराव मुंडगणुर, डॉ. महेश शिंदे ,विक्रमभाऊ कांबळे, बाळ भोसले , म्हैसाळ भाजपाचे नेमिनाथ चौडाज, शेतकरी संघटनेचे एम के माळी,, नंदकिशोर माळी, रमेश पाटील, छगन मरगाळे, सुनील रसाळे ,कोगनोळे यांच्यासह असंख्य पूर्व भागातील शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.