शिवाजी स्टेडियमची धोक्यात असलेली बैठक व्यवस्था; 40 वर्षापूर्वीचे सिमेंट काँक्रीटचे बांधकाम उतरावे लागणार
संग्राम काटकर / कोल्हापूर
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या शानदार खेळाने नावाऊपाला आलेल्या छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या सिमेंट कॉक्रिटच्या बैठक व्यवस्था व त्याच्या पिलर्सनी धोक्याची घंटा वाजवली आहे. 40 वर्षापूर्वी बांधलेल्या या स्टेडियमचे पिलर व बैठक व्यवस्था आता हजारो लोकांचा भार पेलू शकणार नाहीत, असा निष्कर्ष स्ट्रक्चरल ऑडीटमधूनच पुढे आला आहे. शिवाय या ऑडिटमधून आज ना उद्या स्टेडियमची संपूर्ण बैठक व्यवस्था उतऊन घ्यावी लागेल स्पष्ट झाले आहे. या संदर्भातील अहवाल जिल्हा क्रीडा संकुल समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्यासमोर मांडला आहे. आता त्यांच्या ग्रीन सिग्नलनंतरच बैठक व्यवस्थेबाबतची पुढील कार्यवाही होणार आहे.
क्रिकेटसाठी एक स्वतंत्र मैदान असावे, हा उद्देश घेऊन श्री छत्रपती शिवाजी जिल्हा स्टेडियम ट्रस्टने 1983 ते 85 या कालावधीत 12 ते 14 हजार प्रेक्षक बसतील इतक्या क्षमतेचे शिवाजी स्टेडियम बांधले. स्टेडियमच्या सिमेंट काँक्रीटच्या अवाढव्य अशा संपूर्ण बैठक व्यवस्थेखालील प्रत्येक दोन पिलरमध्ये एक गाळा याप्रमाणे 82 गाळे तयार केले. गाळ्यांमध्ये व्यवसाय करणाऱ्यांकडून दरमहा मिळणाऱ्या भाड्यातून स्टेडियमची देखभाल करावी असेही ठरवले. सुरवातीच्या काळात जसे भाडे मिळत गेले तसे त्यातून शिवाजी स्टेडियमची देखभाल होत राहिली. 2000 साली मात्र शिवाजी स्टेडियम ट्रस्टने काही कारणात्सव हे स्टेडियम जिल्हा प्रशासनाकडे हस्तांतरीत केल्याने त्याचे मालक प्रशासन झाले. शासनानेही गाळेधारकांकडून मिळणाऱ्या मिळत राहणाऱ्या भाड्यातून स्टेडियमची देखभाल सुऊ केली. असे असले तरी या स्टेडियमच्या बैठक व्यवस्थेचा पुर्वीचा सुवर्णकाळ नजरेआड होऊ शकत नाही. 1986 साली बलाढ्या वेस्टइंडिज व भारताचा पश्चिम विभागीय संघ यांच्यात स्टेडियममध्ये झालेले क्रिकेट सामने हजारो कोल्हापूरकरांनी स्टेडियमच्या बैठक व्यवस्थेत बसून पाहिलेत. भारत-पाकीस्तानमध्ये झालेल्या हॉकी सामन्यांसह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय रेसरांची झालेली मोटोक्रॉस स्पर्धा पाहण्यासाठीही याच बैठक व्यवस्थेत न भूतो न भविष्यतो अशी गर्दी होती. मात्र 2004 साली झालेल्या रणजी क्रिकेट सामन्यानंतर गर्दी होईल, अशी स्पर्धाच स्टेडियममध्ये झाली नाही. येथूनच खऱ्या अर्थाने स्टेडियमला घरघर लागायला सुऊवात झाली.
फुटबॉल खेळाडूंनी तर स्टेडियममधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टर्फ खेळपट्टीवर व आऊडफिल्डमध्ये फुटबॉल खेळून त्याची वाट लावली. जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या दुर्लक्षामुळेच स्टेडियमची वाट लागत असल्याचा आरोप खेळाडूंमधून होत राहिला. एकीकडे आरोप होत असतानाच स्टेडियम हे नेत्यांच्या सभा व सांस्कृतिक कार्यक्रमांना दिले जाऊ लागल्याने स्पर्धा आयोजकांनी स्टेडियमकडे पाठ फिरवली. हा प्रकार पाहून संतापलेल्या खेळाडूंनी स्टेडियम खेळाशिवाय अन्य कशालाही देऊ नये, अशी मागणी लावून धरली. तिचा जिल्हा प्रशासनाने विचार कऊन सभा व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्टेडियम देणे बंद केले. हे खेळाडूंच्या दृष्टीने योग्य झाले असली तरी सध्या स्टेडियम ‘असून अडचण…नसून खोळंबा’ अशा अवस्थेत आहे. अशा सगळ्या चित्रविचित्र परिस्थितीतच 6 ते 7 वर्षापासून स्टेडियमच्या बैठक व्यवस्थेने धोका दाखवून दिला आहे. धोक्याची शहानिशी करण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल समितीने बैठक व्यवस्थेसह बैठक व्यवस्थेचा भार पेलणाऱ्या पिलरचे स्ट्रक्चरल ऑडीट केले. यात काही पिलर धोकादायक स्थितीत असल्याचे दिसले. वेळीच बैठक व्यवस्था उतऊन घेतली गेली नाही तर कोणत्याही क्षणी अनुचित प्रकार घडेल, अशी भीती ऑडिटमधून व्यक्त झाली. या भीतीतून बैठक व्यवस्था उतऊन घ्यावी लागेल हे अधोरेखित झाले आहे. या संदर्भातील अहवाल जिल्हा क्रीडा संकुल समिती अध्यक्ष राहूल रेखावार यांच्याकडे दिला आहे. आता त्यांच्याकडून येणाऱ्या ग्रीन सिग्नलनंतरच बैठक व्यवस्थेबाबतपुढील कार्यवाही केली जाणार आहे.
भविष्यात कोणत्याही क्षणी शिवाजी स्टेडियमची धोक्यात गेलेली सिमेंट कॉक्रीटची बैठक व्यवस्था उतऊन घेण्याचा निर्णय होऊ शकतो. तेव्हा बैठक व्यवस्थेखालील बाजूस असलेल्या गाळेधारकांनी आपला व्यवसाय स्थलांतरीत करण्याची तयारी ठेवून जागा शोधायला सुऊवात करावी. बैठक व्यवस्था नव्याने बांधल्यानंतर मुळच्या गाळेधारकांना प्राधान्याने गाळे दिले जातील. शिवाय काही r नवीन गाळेही तयार कऊन उत्पन्नात भर घातली जाईल.
डॉ. चंद्रशेखर साखरे (सचिव : जिल्हा क्रीडा संकुल समिती)