भारतात 2018 मध्ये असणाऱ्या 2, 967 इतक्या वाघांमध्ये 6. 74 टक्क्यांनी वाढ होऊन ती 3,167 वर पोहोचल्याची आकडेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली. प्रोजेक्ट टायगरला 50 वर्ष निमित्ताने कर्नाटकातील म्हैसूर येथून ही आकडेवारी आली आहे. 2006 मध्ये 1,411 वाघ होते; 2010 मध्ये 1,706; 2014 मध्ये 2,226 आणि 2018 मध्ये 2,967. अंदाजानुसार 2006 पासून वाघांच्या संख्येत 124.45% वाढ झाली आहे.
भारताच्या 5 व्या व्याघ्र जणगणनेची आकडेवारी जाहीर करताना त्यांनी वाघांवरील धोरणात्मक उपक्रमही जाहिर केले. या जनगणनेच्या स्मरणार्थ 50 रुपयाचे नाण्याचे लोकार्पण करण्यात आले.
वाघ, बिबट्या, चित्ता, सिंह, स्नो लेपर्ड्स, प्यूमा आणि जग्वार यांचा समावेश असलेल्या सात मोठ्या मांजर वर्गीय प्राण्यांच्या संवर्धनासाठी पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स देखील सुरू केला. यामध्ये जगभराती सुमारे 97 देश या याचे सदस्य देश असणार आहेत. हवामान बदलासह विविध नैसर्गिक धोक्यांमुळे या जमातीचा नाश रोखण्यावर लक्ष ठेवण्यावर भर दिला जाईल. देशात असणाऱ्या व्याघ्र प्रकल्पांची संख्या 2006 पासून 28 वरून 51 वर गेली आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “देशातील मजबूत व्याघ्र संवर्धन व्यवस्थापनामुळे गुजरातमधील सिंहांच्या संख्येत २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर बिबट्याच्या लोकसंख्येमध्ये सुमारे 63% वाढ झाली आहे जी 2014 मध्ये 7,910 वरून 2018 मध्ये 12,852 झाली आहे.
तसेच पंतप्रधान मोदींनी सर्व व्याघ्र प्रकल्पातील देशांतील आंतरराष्ट्रीय पाहुण्यांना पश्चिम घाटातील जैवविविधतेचे रक्षण करणार्या आणि या प्रदेशातील निसर्गाशी सुसंवाद साधणार्या आदिवासी समुदायांच्या अनोख्या जीवनशैलीकडे लक्ष देण्याचेही आवाहन करण्यात आले.