कणकुंबीत म. ए. समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांचा प्रचार
खानापूर : विकासाच्या नावाखाली निसर्ग संपदेने नटलेल्या कणकुंबी भागाचे लचके तोडणार्या कर्नाटक शासनापासून भागाचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांना मत द्या, असे आवाहन माजी जिल्हा पंचायत सदस्य विलास बेळगावकर यांनी केले.
कणकुंबी येथे खानापूर मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या पदयात्रेत समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.