राधानगरी / प्रतिनिधी
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडूनही या वर्षी पाण्याची जादा मागणी वाढल्याने गत सात वर्षाच्या तुलनेत पाण्याची नीचांकी पातळी गाठली आहे, या वर्षी वळीव सदृश व अवकाळी पाऊस न झाल्यामुळे सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढली आहे, याचा परिणाम शेती व नागरीजीवनावर होणार आहे, पावसाळा लांबणीवर पडल्यास पाणी टंचाई निर्माण होणार आहे, यासाठी आगामी काळात पाणी जपून वापरावे असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
गेल्या वर्षी धरण पाणलोट क्षेत्रात 4493 मी मी पाऊस होऊन 7 मे अखेर 3165,77 द ल घ फूट इतका पाणीसाठा उपलब्ध होता, तर पाणी पातळी 318,67 फूट व पाणीसाठा4043,26 द ल घ फूट(4,04 टीएमसी) इतके पाणी शिल्लक होते मात्र यावर्षी पाणी पातळी 308,93 फूट व पाणी साथ 3124,36 द ल घ फूट(3, 12 टीएम सी) शिल्लक आहे, साधारणपणे गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या धरणात कमी पाणी साठा उपलब्ध आहे.
या वर्षी पाणी साठा गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्याने धरणातून मागणीनुसार कमी अधिक प्रमाणात पाणी भोगावती नदी पात्रात सोडले जाते, अद्यापही पावसाळा सुरू होण्यास एक महिन्याचा कालावधी असल्याने पाण्याचा वापर कमी करावा असे पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे
चालू हगामात दुधागंगा धरणात पाणी साठा कमी आहे. त्यामुळे गैबी बोगद्यातून भोगावती नदीत कमी प्रमाणात पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे भोगावती व पंचगंगा नदीकाठावरील शेतकऱ्यांना पाणी जपून वापरणे आवश्यक आहे.- प्रवीण पारकर उपकार्यकरी अभियंता, पाटबंधारे विभाग