Sharad Pawar News : शाहू- फुलेंच्या विचारांना धक्का लागू देणार नाही.एकोप्याने राहणाऱ्या समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकशाही टिकवण गरजेचं आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्राची प्रगती एकत्र येवून साधूया असं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना केलं. लोकशाहीचा अधिकार जतनं करणं गरजेचं आहे. यशवंतरावांचे विचार अजूनही आपल्यामध्ये असल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळी श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण, अनिल देशमुख पवारांसोबत होते.
आज शरद पवार यांनी प्रीतीसंगमावर येऊन यशवंतरावांच्या स्मृतीस्थळावर वंदन केलं. गुरु पोर्णिमेचा उल्लेख करताना यशवंतराव चव्हाण यांच त्यांच्या आयुष्यातील महत्त्व आणि त्यांच गुरुस्थानी असणं याचा उल्लेख केला आहे.
शरद पवार यांचा पुणे-कराड प्रवास आज अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण ठरला.त्यांच्यासोबत कार्यकर्ते, नेते आणि जनतेचा किती पाठिंबा आहे हे आज दिसून आलं. काल त्यांनी पत्रकार परिषदेवेळी सुध्दा सांगितलं होत की, मी लोकांच्यात जाणार आहे.आज पुण्यातील मोदी बागेपासून ते कराडपर्यंत जनता, नेते आणि कार्यकर्त्यांचा तुफान प्रतिसाद दिसून आला.यानंतर शरद पवार साताऱ्यात जाणार आहेत. रयत शिक्षण संस्थेची बैठक तेथे पार पडणार आहे.त्यानंतर ते मुंबईला रवाना होणार आहेत. आज मुंबईत देखील काही बैठकिंच नियोजन करण्यात आले आहे.