प्रतिनिधी,विटा
लोकसभेबाबत शिंदे गटाच्या भूमिकेबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल,परंतु कुठल्याही पक्षाला कमीपणा येईल असे काही ही होणार नाही,अशा शब्दात मंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेना शिंदे गटाची भूमिका स्पष्ट केली.त्यामुळे लोकसभेबाबत भाजपच्या मिशन 45 वर शिंदे गट काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
शिंदे सरकारमधील मंत्री आणि शिवसेना प्रवक्ते मंत्री दीपक केसरकर यांनी आज आमदार अनिल बाबर यांची सदिच्छा भेट घेतली.यावेळी भाजप खासदार संजय पाटील, अमोल बाबर,सुहास बाबर उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना केसरकर यांना राज्यात लोकसभेच्या 45 च्या वर जागा जिंकण्याची भाजपचे उद्दिष्ट आहे, याबाबत छेडले असता, मंत्री केसरकर म्हणाले,राज्यात आम्ही आणि भाजप एकत्र आहोत.आता अजितदादा ही आम्हाला मिळाले आहेत.त्यामुळे जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.सांगली लोकसभेबाबत शिंदे गटाची भूमिका काय या प्रश्नावर मंत्री केसरकर म्हणाले, हे निर्णय आमच्या पातळीवर होत नाहीत.बोलताना काय कोणी काहीही बोलतो.पण आमची युती भक्कम आहे.काही निर्णय दिल्लीच्या,वरिष्ठ पातळीवर होतात.सांगली लोकसभेबाबत शिंदे गटाच्या भूमिकेबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेजण एकत्र बसून निर्णय घेतील.
बाबर यांचे मंत्रिपद नक्की
कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही पक्षाला कमीपणा येईल असे काहीही होणार नाही, असे उत्तर मंत्री केसरकर यांनी दिले. दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत विचारले असता तुम्हाला झाल्यानंतर कळणारच ना? असे उत्तर दिले, त्यावर आमदार बाबर यांना संधी मिळणार का याबाबत थेट विचारले असता मंत्री केसरकर यांनी आमदार बाबर हे आमच्या मंत्रिमंडळातले सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत.त्यामुळे हा प्रश्न तुम्ही आम्हाला विचारता कामाच नये. त्यांनी पाण्याबाबत जी लोकांची समस्या सोडवून काम केले आहे ते फार मोठे आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपदा पेक्षा दुसरा कुठला पर्याय असेल असे मला व्यक्तिशः वाटत नाही,असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.