नवी दिल्ली :
देशातील विमा क्षेत्रामध्ये गेल्या 9 वर्षात 54 हजार कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक झाली आहे. सरकारने थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा 2014 मध्ये 26 टक्के केली होती. त्यानंतर 2015 मध्ये हे प्रमाण वाढवून 49 टक्के केले होते. तर 2021 मध्ये थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा 74 टक्क्यांपर्यंत वाढविली गेली आहे. या वाढीमुळे या क्षेत्रात आजवर विक्रमी स्वरुपात विदेशी गुंतवणूक होऊ शकली आहे.