प्रतिनिधी/ बेळगाव
प्रस्तापितांच्या साहित्यातून केवळ कल्पनाविलास करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु उपेक्षितांचे साहित्य हे ग्रामीण, शेतकरी, दलित, कामगारांच्या जगण्याच्या संघर्षामधून निर्माण झाले. साहित्यामधून वास्तव्याची दाहकता मांडता आली पाहिजे. परंतु आजवर प्रस्तापितांनी साहित्यातून शोषित, उपेक्षितांना परावृत्त केले, असा घणाघात मुंबई येथील जे÷ साहित्यिक व निवृत्त पोलीस महासंचालक उद्धव कांबळे यांनी केला.
येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने आयोजित 15 वे मराठी साहित्य संमेलन रविवारी पार पडले. परमेश्वरनगर येथील राष्ट्रपिता महात्त्मा गांधी संमेलननगरीत हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते.
अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाते ते साहित्य. आपण शब्द सामर्थ्य घेऊन समाजामध्ये उभे राहत असतो. आपल्या भावना, मनातील खदखद व्यक्ती करण्याची अभिक्यक्ती आपल्याला साहित्यातून मिळते. ही खदखद व्यक्त न झाल्यास ती व्यक्ती मनोरुग्ण होण्याची शक्मयता असते. त्यामुळे आलेल्या मरगळीला वाट करून देण्याचे सामर्थ्य हे साहित्यामध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण, दलित-निग्रो, असे विविध प्रकार साहित्यात कालांतराने घेऊ लागले. यामुळे साहित्य समृद्ध होऊ लागले. प्रस्तापितांकडून उपेक्षितांची फसवणूक होण्याची शक्मयता सर्वाधिक असते. यासाठी नव्या साहित्यावर देखरेख व नियंत्रण आणण्यात येते. उपेक्षितांना प्रलोभने, बक्षिसांची आमिषे दाखविली जातात. प्रसंगी वास्तवाची तोडमोड करून साहित्याची निर्मिती केली जाते.जगातील 70 टक्के साहित्य हे जगण्यावर आधारित असते. परंतु साहित्यिक कल्पनाविलास करून ते साहित्य काल्पनिक का? करतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. साहित्यातून सत्य समोर येणार नाही, यासाठी प्रयत्न केला जातो. त्यामुळे आपल्याला व्यक्त होण्याकरिता लिहीते व्हा, असे कांबळे यांनी आवाहन केले.
मातृभाषेतील शिक्षण सर्वात श्रेष्ठ
भाषा ही सर्व गुणदोषांसह जन्म घेते. भाषेमध्ये व्यक्त होण्याचे सामर्थ्य आहे. परंतु भाषेवरीही काही मर्यादा येत असतात. आज मातृभाषेतून शिक्षण दिलेले देश सर्वात प्रगतीपथावर आहेत. चीन, जपान, फ्रान्स सारखा देश आजही आपल्या भाषेतून शिक्षण देतो. आपण मात्र इंग्रजी माध्यमाकडे वळलो आहे. परंतु भातृभाषेतून मिळालेले शिक्षण हे सर्वात श्रेष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले.
येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन सैनिक मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे चेअरमन बाबुराव मुरकुटे यांच्या हस्ते झाले. राष्ट्रपिता महात्मा गांधी संमेलननगरीचे उद्घाटन उद्योजक सुधीर दरेकर यांच्या हस्ते केले. कै. के. बी. निलजकर प्रवेशद्वाराचे उद्घाटन जि. पं. सदस्य रमेश गोरल, दिवंगत दया हट्टीकर ग्रंथदालनाचे उद्घाटन मान्यवरांनी केले. दिवंगत यल्लाप्पा महादेव मेणसे सभामंडपाचे उद्घाटन एपीएमसी सदस्य आर. के. पाटील, स्वामी विवेकानंद विचारपीठाचे उद्घाटन निवृत्त शिक्षणाधिकारी सी. एल. कंग्राळकर, महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले प्रतिमेस ऍड. शाम पाटील, मुकुंद घाडी यांच्या हस्ते तर सरस्वती पूजन ता. पं. सदस्य रावजी पाटील, संत तुकाराम प्रतिमेस पुष्पहार अर्पण ऍड. सुधीर चव्हाण, गावडोजी पाटील प्रतिमेस पुष्पहार अर्पण नागनाथ जाधव, राष्ट्रवीरकार गुरुवर्य शामराव देसाई प्रतिमेस दुदाप्पा बागेवाडी यांनी पुष्पहार अर्पण केला.
स्वागताध्यक्ष विजय नंदिहळ्ळी हे म्हणाले, येळ्ळूर ही रत्नाची खाण आहे. येळ्ळूर गावातील अनेक जण शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये मोठे कार्य केल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रा. सी. एम. गोरल यांनी केले. संमेलनाचे सूत्रसंचालन रणजित चौगुले यांनी केले. साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे यांनी भाषण करून समारोप केला.
साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व कृषी पुरस्कार
येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि कृषी क्षेत्रातील व्यक्तींचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येतो. यावषी ‘राष्ट्रवीर’कार शामराव देसाई साहित्यिक डॉ. अमृत यार्दी यांना देऊन सत्कार करण्यात आला. कै. मारुती पाटील (पेंटर) सामाजिक पुरस्कार कॉ. कृष्णा शहापूरकर, रमाबाई आंबेडकर महिला सामाजिक पुरस्कार कॉ. मेधा सामंत, गुरुवर्य गावडोजी पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार येळ्ळूरच्या शिक्षिका शोभा राजाराम निलजकर, क्रीडा पुरस्कार उमेश मजुकर, विद्यार्थी क्रीडा पुरस्कार कार्तिक शिवाजी गोरल याला देण्यात आला. त्यांच्या वडिलांनी तो पुरस्कार स्वीकारला. कृषी पुरस्कार निंगाप्पा चाळके यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
पोलीस बंदोबस्त
मराठी साहित्य संमेलन असल्याने गावामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्वत्र पोलीस तैनात करण्यात आले होते.
शिक्षण अधिकाऱयांची दडपशाही
मराठी साहित्य संमेलनामध्ये शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी भाग घेऊ नये म्हणून शिक्षण अधिकाऱयांनी शाळांना नोटिसी पाठवून दिल्या होत्या. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या दडपशाहीचा निषेध करण्यात आला आहे.