ऑनलाईन टीम / मुंबई :
ट्रेन सुरू होणार ही अफवा करणाऱ्यांचा तपास सुरू असून लवकर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत असे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
मुंबईतील वांद्रे भागात काल हजारो मजुरांनी जमा झाले होते. लॉक डाऊन वाढला असला तरी ट्रेन सुटणार आणि आपल्याला घरी जायला मिळणार अशी आशा त्यांना होती. कारण ट्रेन सुटणार अशी अफवा पसरवण्यात आली होती आणि या अफवेमुळे हा जमाव जमला होता. जमाव पांगिण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार ही करावा लागेल. त्यानंतर या जमावाला समजल्यावर, हे मजूर घरी गेले.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परप्रांतीयांनी अजिबात घाबरू नये, तुम्ही महाराष्ट्रात सुरक्षित आहात असं म्हटले आहे.
आता या प्रकरणी ज्यांनी कोणी अफवा पसरवली आहे त्याची चौकशी करण्यात येईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.