वसई /प्रतिनिधी
मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या वसई तालुक्यातील २३७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यात महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. संचार बंदीचा नियम मोडून वसई तालुक्यातील हजारो नागरिक मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडत असल्याचे पाहून तालुका पोलिसांनी ही कारवाई केली. माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३६ वालीव मधील १९ , नालासोपाऱ्यातील ५९,तुळींज मधील २, विरारमधील ८८ आणि अर्नाळ्यातील ८१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात ११८ पुरुष आणि ९२ महिलांचा समावेश आहे.