प्रतिनिधी/रत्नागिरी :
रत्नागिरी जिह्यातून मिरज येथे तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यातील गुरूवारी सायंकाळपर्यत 8 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या अहवालांपैकी 23 अहवाल अद्याप प्रलंबीत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जिल्हय़ात आतापर्यंत 500 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील 469 अहवाल निगेटीव्ह आले आहे. अद्याप 23 अहवाल प्रलंबीत असल्याचे प्रशासनाने सांगितले. राजीवडा येथील वृद्धाचा दुसरा अहवालही निगेटीव्ह आल्याने त्याला रूग्णालयातून डिस्चार्ज देऊन एमआयडीसी विश्रामगृहात क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या साखरतर येथील दोन महिला रूग्णांचे अहवालही निगेटीव्ह आले असून त्यांना आणखीन आठवडाभर वैद्यकीय नियंत्रणखाली ठेवण्यात येणार आहे. आता शासकीय रुग्णालयात केवळ 6 महिन्याच्या पॉझिटिव्ह रुग्ण आयसोलेशनमध्ये मध्ये आहे. त्याचीही प्रकृती खूप चांगली असून त्याचेही स्वॅब मिरज येथे पाठवण्यात येणार असून दुसरे रिपोर्ट लवकरच प्राप्त होतील अशीही माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
जिल्हय़ातील होम क्वारंटाईनची संख्या 1118 असून 476 जण संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. केशरी कार्ड धारकांना 1 लाख उत्पनाची मर्यादा लक्षात घेऊन मे व जूनसाठी गहू व तांदूळ सवलतीचा दरात देण्यात येणार आहे. यातील 70 टक्के साठा प्राप्त झाला असून शुक्रवारपासून कार्डनिहाय कोटय़ाच्या 70 टक्के धान्य पुरवठा करण्यात येईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.