ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. या काळात रेशन दुकानात काळा बाजार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. काळा बाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.
या अंतर्गत नियमांचे पालन न करणाऱ्या राज्यातील एकूण 39 दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
ते म्हणाले, आत्ता पर्यंत 39 दुकानांवर गुन्हे, 87 दुकानांचे निलंबन आणि 48 रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच स्वस्त धान्य दुकानांमध्ये वाटप करताना कमी धान्य दिल्यास तथा जास्त पैसे घेतल्यास, नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई चा इशारा देण्यात आला आहे.