तापमान 38 डिग्री, नागरिकांची नदीच्या ठिकाणी ओढ
प्रतिनिधी / वाळपई
गेल्या चार दिवसापासून सत्तरी तालुक्मयाच्या वेगवेगळय़ा भागांमध्ये उष्णतेचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. आज दिवसभर उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी सत्तरी तालुक्मयातील गोडय़ा नदीच्या पाण्यावर आंघोळ करणे पसंत केले.
सत्तरी तालुक्मयात वेगवेगळय़ा ठिकाणी नागरिक मोठय़ा प्रमाणात नदीच्या पाण्यामध्ये आंघोळ करताना पहावयास मिळाले. मात्र सामाजिक अंतराचा आदर राखून ही मंडळी गोडय़ा पाण्याचा आस्वाद मुक्तपणे घेताना दिसत होते. याबाबतची माहिती अशी की गेल्या चार दिवसापासून सत्तरी तालुक्मयात उष्णतेचे प्रमाण प्रचंड प्रमाण वाढलेले आहे .
आज एकूण प्राप्त झालेल्या माहितीनुसार तापमान जवळपास 38 सेल्सयिस एवढे होते. सकाळपासून उष्णता प्रचंड प्रमाणात वाढली होती .दुपारी 12 ते 2 दरम्यान उष्णतेचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले होते. रविवारी अनेक नागरिकांनी कुटुंबासहित नदीच्या पाण्यावर आंघोळ करण्यात आपला वेळ घालवला. म्हादई, वाळवंटी, रगडा अशा या प्रमुख नद्यावर नागरिक मोठय़ा प्रमाणात उष्णतेपासून राहत मिळण्यासाठी आंघोळ करताना दिसत होते .काही कुटुंबियांनी सकाळपासूनच नदीवर आपला दिवस घालवल्यामुळे त्यांना उष्णेतेपा पासून चार हात लांब राहणे अधिक संयुक्तिक ठरले.
सध्या सत्तरी तालुक्मयातील गोडय़ा पाण्याच्या स्थळावर नागरिक मोठय़ा प्रमाणात आंघोळ करताना दिसत आहेत .महत्त्वाचे म्हणजे उष्णता प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे .यातच कोरोना रोगाचा वाढता पार्श्वभूमीवर नागरिकांना वेळ दवडण्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध होत नसल्यामुळे आता उष्णतेचे कारण स्पष्ट करून मंडळी मोठय़ा प्रमाणात नदीच्या पाण्यावर प्रचंड प्रमाणात अंघोळ करताना दिसत होते.
गेल्या चार दिवसांपूर्वी सत्तरी तालुक्मयाच्या अनेक भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या होत्या. आज मात्र दिवसभर उष्णतेचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले होते .यामुळे अनेक स्तरावर नागरिकांनी आपला मोर्चा नदीच्या पाण्यावर वळल्यावर अधिक भर दिला .सत्तरी तालुक्मया बरोबरच इतर अनेक तालुक्मयातील मंडळी आज मोठय़ा प्रमाणात सत्तरीच्या नद्याच्या गोडय़ा पाण्याचा आस्वाद घेण्यासाठी मोठय़ा प्रमाणात आले होते .
महत्त्वाची बाब अशी की आरोग्य खात्याच्या मार्गदर्शक तत्त्वां®ााr अंमलबजावणी करून अनेकांनी सामाजिक स्तरावर दुरावा राखून नदीच्या पाण्याचा आस्वाद घेण्यावर भर दिला. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाली नाही. काही ठिकाणी पोलिसांनी धाव घेऊन या परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांनी मार्गदर्शक तत्त्वां®ााr अंमलबजावणी केल्यामुळे त्यांना मोठीशी अडचण निर्माण झाली नाही.