चार लोक एकत्र जमले की, एखाद्या गोष्टीवर गप्पा सुरू होतात. प्रत्येकजण एकाच मुद्यावर वेगवेगळे मत मांडतो. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. त्यानुसार तो वागतो, विचार करतो. आपण सध्या कोरोना संकटात सापडलो आहोत. त्याची भयानकता, गांभीर्य विचारशील लोकांच्या लक्षात येते. शासनाच्या विविध सूचनांचे पालन करण्याची त्यांची वृत्ती असते. पण ज्यांना गांभीर्य वाटत नाही, ते कोणतेही नियम न पाळता बेजबाबदारपणे वागतात. काही लोक बऱयाच दिवसांनी एकत्र घरात राहता येते याचा आनंद मानतात. आपल्या आवडीनिवडी, कला यांना वाव देत आहेत. बऱयाच स्त्रिया घरात आहेत त्या किराण्यात उधळमाधळ न करता नवनवीन पदार्थ करून घरातल्यांना खाऊ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. काही सामाजिक बांधीलकी मानून, गरजूंना, पशुपक्ष्यांना खाऊपिऊ घालत आहेत, कोणी आर्थिक मदत करत आहेत, तर काही ह्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन घरफोडी, दुकानफोडी, चोऱयामाऱया, घरगुती अत्याचारही करत आहेत इ.इ. म्हणजेच ज्याच्या स्वभावाला जे पटेल तसे ते करत आहेत. प्रत्येकाची वागण्याची पद्धत वेगवेगळी आहे. अशाच आशयाचे एक संस्कृत सुभाषित आहे.
पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना कुण्डे कुण्डे नवं पयः।
जातौ जातौ नवाचारः नवा वाणी मुखे मुखे।।
अर्थ:- प्रत्येक व्यक्तीची बुद्धी भिन्न असते, प्रत्येक विहिरीत पाणी वेगळे असते, जातजातीत आचार भिन्न असतो, प्रत्येकाच्या मुखात भाषा वेगळी असते.
सृष्टीत जशी प्रत्येक ठिकाणी विविधता दिसते, तशी माणसांच्या ठिकाणीही दिसते. म्हणतात ना, ‘व्यक्ती तितक्मया प्रकृती’ किंवा एकाच हाताची बोटे सारखी नसतात!
कुणी हुशार, कुणी मंद, कुणी रागीट, कुणी शांत, कुणी काळा कुणी गोरा, कुणी स्वार्थी कुणी उदार, कुणी सुष्ट कुणी दुष्ट! तर माणसांचेच काय, पण पशुपक्षी, झाडेवेली, नद्या, सागर इ. सर्वातच वैविध्यपूर्णता दिसते. माणूस बुद्धिमान प्राणी असल्याने तो त्याची बुद्धी जशी वापरेल तसा त्याचा स्वभाव बनतो. त्याचे आचार, विचार, उच्चार वेगवेगळे होतात. त्यामुळे आपण एकसारख्याच वागण्याची, बोलण्याची कोणाकडूनही अपेक्षा करू शकत नाही. कोणाकडे काय नसते हे सांगणाराही एक श्लोक आहे.
नास्ति सत्यं द्यूतकारे न शौचं वृशलीपतौ।मद्यपे सौह्रदं नास्ति धूर्तेषु त्रितयं च न।।
अर्थः जुगाऱयाकडे सत्य नसते, चांडाळणीच्या पतीकडे शुद्धता नसते, दारूडय़ाकडे मैत्र नसते, लबाडाजवळ ह्या तिन्ही गोष्टी नसतात. जुगार म्हटले की, शकुनीमामा आणि कौरवपांडव आठवतात. शकुनीने कपटाने फासे टाकून पांडवांना द्यूतात हरवून त्यांचे सर्वस्व हरण केले. निरपराध प्राणी मारून खाटिकखान्यात काम करणारा चांडाळ शुद्ध कसा असणार? दारूडय़ाकडे ह्रदयाचा चांगलेपणा नसतो. दारू प्याला की, तो पशु होतो, कोणतेही अमानुष कृत्य करायला मागेपुढे पहात नाही तर लबाड माणसे जागोजागी भेटतात. ती धूर्त, हुशार असतात. पण धूर्त कधीही सत्य बोलत नाही, स्वार्थी असतो, वेळप्रसंगी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. त्यामुळे अशा असंगाशी संग कधी करू नये. अशा ह्या व्यक्ती तितक्मया प्रकृती!
आता थोडंसं संस्कृत संभाषणाकडे वळू.
भवान् कथं अस्ति?-आपण कसे आहात?
गृहे सर्वं कुशलं वा?-घरी सगळं ठीक आहे ना?
आम्, सर्वं कुशलम्।…हो, सर्व ठीक आहे.
भवतः का वार्ता?…तुमची काय खबर?
भवान् एव श्रावयतु।…तुम्हीच सांगा.
किं, मेलनं बहु विरलं जातम्।…काय, हल्ली भेटतच नाही!