बळीराजाला दिलासा, बाजारपेठेतील व्यापाऱयांची उडाली तारांबळ
प्रतिनिधी/ बेळगाव
रविवारी झालेल्या मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने अनेक घरांत, दुकानांमध्ये पाणी शिरले होते. यामुळे एकच तारांबळ उडाली. त्यानंतर दुसऱया दिवशीही मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसामुळे बाजारपेठेतील बैठे व्यापारी आणि फेरीवाल्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या पावसामुळे अनेक रस्त्यांवरील सखल भागामध्ये पाणी तुंबले होते. गटारी भरून रस्त्यावरून पाणी वाहताना दिसत होते.
कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बाजारपेठेमध्ये नेहमीच शुकशुकाट पसरत होता. मात्र गेल्या 15 दिवसांपासून काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले होते. त्यानंतर आता 1 जूनपासून बऱयाच प्रमाणात निर्बंध शिथिल झाल्याने सोमवारी बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी होती. मात्र, सकाळपासूनच पावसाच्या दमदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे व्यापाऱयांची आणि खरेदीदारांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
रविवारी झालेल्या दमदार पावसामुळे गटारी भरून पाणी रस्त्यावरून वाहून जात होते. गटारीतून वाहून आलेला कचरा रस्त्यावर आला होता. घरांमध्येही पाणी शिरले. पहिल्याच दमदार पावसामुळे साऱयांची तारांबळ उडाली. मागील वषीच्या महापुराची आठवण साऱयांना या पावसाने करून दिली. मान्सूनपूर्वी झालेल्या या दमदार पावसामुळे अनेक नाले आणि गटारी भरून वाहत होते. याचबरोबर नाले सफाई केली नसल्यामुळे त्याचा फटका अनेकांना सहन करावा लागला.
सोमवारीही झालेल्या दमदार पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचून होते. या पावसामुळे काही प्रमाणात हवेमध्ये गारवा निर्माण झाला होता. पावसाने बळीराजाला मात्र चांगला दिलासा दिला आहे. अनेक ठिकाणी धूळवाफ पेरणी करण्यात आली होती. त्यांना हा पाऊस फायदेशीर ठरला आहे. याचबरोबर आता पेरणीसाठीही हा पाऊस पोषक ठरल्याचे शेतकऱयांतून बोलले जात आहे. तालुक्मयातील काही गावांमध्ये धूळवाफ पेरणी केली जाते तर काही गावांमध्ये भात लागवड केली जाते. भात लागवड करणाऱया शेतकऱयांना मशागतीसाठीही हा पाऊस फायद्याचा ठरला आहे.
पहिल्याच दमदार पावसामुळे दुचाकीस्वारांना रेनकोट आणि हेल्मेटचा आधार घ्यावा लागला. याचबरोबर पादचाऱयांना छत्रीचा आधार घ्यावा लागला. सोमवार असल्यामुळे खरेदीसाठी ग्रामीण भागातील जनता आली होती. मात्र, भर पावसातच खरेदी करून त्यांना माघारी फिरावे लागले. एकूणच मान्सूनची चाहुल या पावसाने करून दिली आहे..