मंत्री रविशंकर प्रसाद यांची माहिती : 50 हजार कोटींचे अर्थसहाय्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरकारने मेबाईल उपकरण बनविणाऱया जागतिक कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे पुनर्निमिती करण्यासाठीच्या योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार 50 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार आहे. यासाठी संबंधीतांकडून सरकारने अर्ज मागवले आहेत, अशी माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली.
देशात जगातील प्रमुख मोबाईल पुनर्निमिती कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी व स्थानिक कंपन्यांना चालना देण्यासाठी हा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. जवळपास पाच ते सहा मोठय़ा कंपन्या आहेत की, ज्यांनी जागतिक बाजारातील 80 टक्के बाजारावर नियंत्रण प्राप्त केले आहे. आपल्या देशातील तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगावर जास्तीत जास्त भर दिला जाणार असल्याचे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.
प्रोत्साहन योजना
आत्मनिर्भर संकल्पनेच्या आधारे देशाला मजबूतीकडे नेण्यासाठी सरकारने एप्रिलमध्ये तीन योजना आणल्या आहेत. यात
इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे व सेमिकंडक्टरची पुनर्निमिती, संशोधित इलेक्ट्रॉनिक्स पुननिर्मितीवर भर दिला असून आगामी काळातही प्रोत्साहन योजनेचा विस्तारासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचा विश्वास रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केला आहे.