राधानगरीत 19 टक्के पाणीसाठा, सर्व बंधाऱयांवरील बरगे काढले.
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात दोन दिवसांपासून पडत असलेल्या संततधारेमुळे सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. बुधवारी निसर्ग चक्रीवादळामुळे पश्चिमेकडील डोंगरी तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी, काळम्मावाडीसह अन्य धरणांमध्ये पाण्याचा फ्लो वाढला आहे. एका राधानगरी धरणात गतवर्षीच्या तुलने आजच्या दिवशी 5.82 दशलक्ष्य घनमिटरने पाणीसाठा वाढला आहे. सध्या राधानगरी धरणात 43.96 दलघमी पाणीसाठा आहे. दरम्यान गुरुवारी सकाळपासूनच पावसाने उसंत घेतली असून कोयना धरणातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.दरम्यान सकाळी सात वाजता संपलेल्या 24 तासात गगनबावडय़ात सर्वाधिक 138 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
धरणांतील पाणीसाठा (दलघमी)
तुळशी 47.01
वारणा 325.78
दूधगंगा 211.42
कासारी 23.65
कडवी 30.35
कुंभी 27.52
पाटगाव 23.79
चिकोत्रा 13.87
चित्री 13.05
जंगमहट्टी 9.54
घटप्रभा 14.12
जांबरे 6.29
कोदे 1.38
तालुकानिहाय पाऊस (मिमी)
हातकणंगले 12.13
शिरोळ 8.29
पन्हाळा 43.29
शाहूवाडी 53.67
राधानगरी 38.50
गगनबावडा 138
करवीर 29
कागल 24.86
गडहिंग्लज 27
भुदरगड 39.60
आजरा 41.50
चंदगड 71.50