25 कोटीचा निधी मंजूर, निविदा काढण्यासाठी राज्य शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील रेल्वे फाटकांवर वाहनांची गर्दी वाढत आहे. तसेच रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे शहरातील रेल्वे फाटकांवर उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. या अंतर्गत पहिले आणि दुसरे रेल्वेगेट येथे उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येणार असून, याकरिता 25 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. पण निविदा काढण्यासाठी राज्य शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.
शहराच्या मध्यभागी असलेल्या रेल्वे फाटकांवर उड्डाणपूल उभारण्याचे काम रेल्वे प्रशासन आणि राज्य शासनाने सुरू केले आहे. रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करण्यात येत असल्याने फाटक हटवून या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. सध्या शहराची लोकसंख्या वाढली आहे. तसेच वाहनसंख्यादेखील वाढत असल्याने रेल्वे फाटकांवर वाहनांच्या रांगा लागत आहे. रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण झाल्यानंतर धावणाऱया रेल्वे गाडय़ांची संख्यादेखील दुप्पट होणार आहे. त्यामुळे शहराच्या मध्यभागी असलेल्या प्रत्येक रेल्वेफाटकावर उड्डाणपुलाची उभारणी करण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाचा आहे. या अंतर्गत कपिलेश्वर रोड, धारवाड रोड, आणि ब्रिटिशकालीन ओव्हरब्रिजच्या ठिकाणी उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. तसेच तिसरे रेल्वेगेट येथे उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू आहे. आता पहिले व दुसरे रेल्वेफाटक येथे उड्डाणपूल उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी केली असून यासाठी 25 कोटीचा निधी मंजूर केला आहे.
रेल्वेखात्यातर्फे आराखडा तयार
या दोन्ही ठिकाणी उड्डाणपूल उभारणीसाठी रेल्वेखात्याने आराखडा तयार करून मंजुरी घेतली आहे. याठिकाणी उड्डाणपूल उभारणीसाठी निविदा काढण्यात येणार आहे. त्याकरिता रेल्वे प्रशासनाने राज्य शासनाच्या परवानगीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. पण सध्या सुरू असलेले तिसऱया फाटकावरील उड्डाणपुलाचे काम अद्याप अपूर्ण आहे. लॉकडाऊनमुळे हे काम बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण झाली आहे. अशा स्थितीत पहिले व दुसरे रेल्वेगेट येथील उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू केल्यास वाहनधारकांची गैरसोय होणार आहे. शहरात येण्यासाठी खानापूर रोड व काँग्रेस रोड हे दोन्ही मुख्य रस्ते आहेत. तिसरे रेल्वेगेट येथील उड्डाणपुलाच्या कामामुळे खानापूर रोड वाहतुकीस बंद आहे. अशात पहिले व दुसऱया रेल्वेफाटकावरील उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आल्यास काँग्रेसरोडदेखील बंद होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे शहरात येणाऱया वाहनधारकांसह नागरिकांची गैरसोय होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे तिसऱया रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतरच पहिले व दुसरे रेल्वेगेटवरील उड्डाणपुलाचे काम सुरू करावे असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे दिला आहे. त्यामुळे निविदा काढण्यास राज्य शासनाने रेल्वे प्रशासनाला मंजुरी दिली नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र तिसऱया रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर पहिले व दुसरे रेल्वे फाटकावर उड्डाणपुलाची उभारणी होणार आहे.