संतप्त खाणग्रस्तानी मांडला समस्यांचा पाढा.
वाळपई / प्रतिनिधी
होंडा पंचायत क्षेत्रातील सोलये येथील चौगुले खाणीतील वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या समस्या व खाणग्रस्तांना आपल्या प्रलंबित मागण्या संदर्भात सादर केलेले निवेदन यांच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी सत्तरी तालुक्मयाचे मामलेदार खाण खात्याचे प्रतिनिधी पोलीस अधिकारी व खाणग्रस्त त्यांच्यासमवेत खाणीची एकूण परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
यावेळी विविध समस्यावर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली . यासंदर्भात अहवाल आता सत्तरी तालुक्मयाच्या उपजिल्हाधिकाऱयाना सादर करण्यात येणार आहे. यावेळी मोठय़ा प्रमाणात उपस्थित असलेल्या ग्रामस्थ व चौगुले कंपनीच्या व्यवस्थापकाला दरम्यान चांगल्या प्रकारे शाब्दकि खडाजंगी पाहायला मिळाली.
याबाबतची माहिती अशी की होंडा ग्रामपंचायत क्षेत्रातील सोलये या ठिकाणी चौगुले कंपनीची खाण आहे. याठिकाणी साठा करून ठेवण्यात आलेल्या खनिज मालाची वाहतूक गेल्या काही दिवसापासून सुरू झालेली आहे. सध्या मोठय़ा प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे या खनिज मालाच्या वाहतूकीमुळे मोठय़ा प्रमाणात समस्या निर्माण होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे खाणग्रस्तांच्या अनेक मागण्या अजूनही प्रलंबित असल्यामुळे संतप्त बनलेल्या खाणग्रस्तांना या वाहतुकीच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. यासंदर्भातील निवेदन सत्तरी तालुक्मयाचे उपजिल्हाधिकारी सत्तरी तालुक्मयाच्या मामलेदार वाळपई पोलीस स्थानक यांना सादर करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे खाणग्रस्तांना खनिज मालाच्या वाहतुकीसंदर्भात अत्यंत आक्रमक धोरण अवलंब केल्याने निर्माण झालेली गंभीर स्वरूपाची परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी संबंधित खात्याच्या अधिकाऱयांच्या समवेत एक बैठक आयोजित करण्यात आली होती
अधिकाऱयांंकडून खाणीची पाहणी.
निश्चित केल्याप्रमाणे आज सकाळी सकाळी तालुक्मयाचे मामलेदार ईशांत सावंत खाण खात्याचे प्रतिनिधी सुरज कलंगुटकर वाळपई पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक सर्वेश गड्डी सहाय्यक उपनिरीक्षक तुळशीदास धुरी संबंधित खाण कंपनीचे व्यवस्थापक रामा कामत खाणग्रस्ताच्यावतिने आनंद गावडे व इतर मोठय़ा प्रमाणात खाणग्रस्त उपस्थित होते.
यावेळी खाण कंपनीने पावसाळी मोसमात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणत्या प्रकारचे काळजी न घेतल्यामुळे मोठय़ा प्रमाणात धोका निर्माण झाल्याचे यावेळी स्पष्ट केले. यामुळे नागरिकांना सदर भागातील शेतात व स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी मोठा धोका निर्माण झालेला आहे. अशा प्रकारची समस्या उपस्थित केली. त्याचप्रमाणे सध्या मोठय़ाप्रमाणात पाऊस पडत असून पावसाचे गढूळ पाणी नैसर्गिक नाल्यांमध्ये जात असल्यामुळे प्रदूषण होऊ लागले आहे. या संदर्भात कोणत्याही प्रकारची काळजी घेण्यात न आल्याचा मुद्दा आनंद गावडे यांनी यावेळी उपस्थित केला.
पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा, बसवाहतूक यावर चर्चा.
दरम्यान यावेळी झालेल्या चर्चेत खाणग्रस्तांना सोलये गावांमध्ये शुद्ध स्वरूपाचा पाणीपुरवठा उपलब्ध होत नसल्याचे तक्रार उपस्थित केली. त्याचप्रमाणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून कंपनीने दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासल्याचे स्पष्ट केले. मुलांसाठी नियोजित वाहतूक या संदर्भातील सुविधा कंपनीने बंद केल्याचा मुद्दा आनंद गावडे यांनी यावेळी उपस्थित केला. त्यासंदर्भात बोलताना कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले की गेल्या काही दिवसापासून शुद्ध स्वरूपाच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे आरोग्याच्या सुविधा कंपनीने उपलब्ध केल्या असून त्याचा फायदा घेण्यासाठी खाणग्रस्तांचा प्रतिसाद लाभत नसल्याचे स्पष्ट केले. सध्या शाळा बंद असल्यामुळे मुलांसाठी कंपनीने सुरु केलेली सुविधा बंद असून शाळा सुरू झाल्यानंतर निश्चित प्रमाणात ही सुविधा उपलब्ध करणार असल्याचे आश्वासन दिले .त्यानंतर संबंधित शिष्टमंडळाने खाण कंपनीच्या परिसरात जाऊन सुरक्षितेचे संदर्भात पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मामलेदार ईशांत सावंत यांनी सांगितले की उपजिल्हाधिकारी मंगलदास गावकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार पाहणी करण्यात आली असून यासंदर्भात अहवाल त्यांना सादर करण्यात येणार आहे.
त्यानंतर यावर विचारविनिमय करून उपजिल्हाधिकारी वाहतूकिसदर्भात निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान खाणीच्या परिसरात सुरक्षितता निर्माण करण्यासाठी कंपनी पुर्णपणे अपयशी ठरली असल्याचा मुद्दा उपस्थित करून यावेळी खाण अधिकाऱयाना धारेवर धरणाचा प्रयत्न झाला असता खाणग्रस्त व अधिकाऱयांच्या दरम्यान चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. शेवटी मामलेदार ईशांत सावंत यांनी हा वाद मिटवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.