बेळगाव
विद्यार्थ्यांना बालवयातच पर्यावरण, विविध फळा-फुलांचे ज्ञान व्हावे, पर्यावरण समतोल, संतुलन संवर्धन व्हावे, यासाठी बागायत खात्याने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तालुक्मयातील 28 शाळांच्या आवारामध्ये विविध जातीच्या तब्बल 5 हजार रोपांची लागवड केली आहे. त्यामुळे शाळांचा परिसर हिरवाईने नटणार आहे.
जिल्हय़ातील प्रत्येक तालुक्मयात यंदा हा उपक्रम राबविला गेला असून सरकारी शाळांच्या सभोवताली व आवारात ही रोप लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे शाळांच्या सौंदयीकरणात भर पडणार आहे. संबंधित ग्राम पंचायतींचे सहकार्य मिळत असून स्थानिक हवामान, पाण्याची उपलब्धता, भौगोलिक स्थिती विचारात घेऊन शाळांच्या आवारात विविध फळांच्या वृक्ष लागवडीला प्राधान्य देण्यात आले आहे. मुलांना विद्यार्थीदशेतच पर्यावरण, झाडांचे महत्त्व व ओळख निर्माण व्हावी, या उद्देशाने बागायत खात्याने हा उपक्रम राबविला आहे.
तालुक्मयातील करडीगुद्दी, मच्छे, पिरनवाडी, येळ्ळूर, हुंचेनहट्टी, मासगोंडहट्टी, होनगा, हलभावी, हुदली, गुंजेहनहट्टी, कुकडोळी, के. के. कोप्प, मास्तमर्डी, शगनमर्डी, सांबरा, अरळीकट्टी, मंडोळी, कर्ले, खादरवाडी आदी गावांतील शाळा, हॉस्टेल व प्राथमिक आरोग्य केंदांतून लागवड करण्यात आली आहे. रोपांच्या लागवडीसाठी रोहयो कामगारांकडून खड्डे खोदण्यात आले आहेत. त्यामुळे कामगारांनाही गावातच रोजगार उपलब्ध झाला आहे. फणस, लिंबू, पेरू, आंबा, कडीपत्ता, नारळ, जांभूळ, डाळिंब, पपई, सीताफळ, आवळा आदी रोपांची स्थानिक परिस्थितीनुसार लागवड करण्यात आली आहे. साधारण प्रत्येक शाळेत 100 ते 150 रोपे लावण्यात आली आहेत.
शाळांच्या आवारात केवळ सावलीसाठी झाडांची लागवड केली जाते. त्याबरोबरच आाता शालेय विद्यार्थ्यांमध्ये वने, जैवविविधता यांचे रक्षण आणि संवर्धन याबाबत आवड निर्माण व्हावी या हेतूने बागायत खात्याने वृक्षारोपण केले आहे. विद्यार्थ्यांना पाठय़क्रम शिकवताना या लावलेल्या झाडांचा उपयोग होणार असून केवळ तालुक्मयातील सरकारी शाळा-कॉलेज व हॉस्टेलमध्ये ही रोप लागवड केली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारातच विविध फळांची चव चाखता येणार आहे.
जमिनीतील धूप, वाढती उष्णता कमी करण्यासाठी व पावसाचे प्रमाण वाढविण्यासाठी वृक्षारोपणाची गरज लक्षात घेऊन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण खात्री योजनेंतर्गत अनुसूचित जाती-जमाती, बीपीएल कार्डधारक व लहान शेतकऱयांना विविध जातींच्या रोप लागवडीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. सध्या पावसाळा असून जमिनीत ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे रोपे लावण्यासाठी पोषक वातावरण आहे. दरवर्षी फलोत्पादन खात्याकडून पावसाळय़ापूर्वी रोप बाजाराचे आयोजन केले जाते. दरम्यान, विविध रंगीबेरंगी फळा-फुलांची रोपे अल्प दरात उपलब्ध करून दिली जातात.
पावसाळय़ात केलेल्या रोप लागवडीला नैसर्गिक पावसाचे पाणी मिळून त्यांची वाढ व संवर्धन होण्यास मदत होते. त्यामुळे पावसाळय़ात वृक्षारोपणाला महत्त्व दिले जाते. कारण या काळात वृक्ष वाढीसाठी पावसाचे पाणी मिळत असते. यासाठी बागायत खात्यामार्फत हा उपक्रम राबविण्यात आला आहे.