बुधवार दिनांक 19 ते मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट 2020.
गणेश चतुर्थी निमित्त काही महत्त्वाच्या सूचना
येत्या 22 ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. चतुर्थी आहे तोपर्यंत केव्हाही गणपतीची मूर्ती आणण्यास हरकत नाही. त्याला काही मुहूर्त पहावा असे नाही, तरीही त्रितियायुक्त चतुर्थी महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे 21 तारखेला रात्री 11 नंतर आणि शनिवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत केव्हाही गणेशमूर्ती आणता येते. गणेश मूर्ती प्रमाणापेक्षा अधिक मोठी आणू नये. शास्त्राप्रमाणे आपल्या हातची वित किंवा 9 इंचापर्यंत गणपती मूर्ती असावी, असा नियम आहे. काहीजण दरवषी जास्त पैसे घालून मूर्तीची उंची वाढवत जातात, हे चुकीचे आहे. गणपती लहान-मोठा, त्याला काही फरक पडत नाही. त्याची कृपा व्हायची तेव्हाच होणार, त्यासाठी नवे पायंडे पडू नका. आपल्या घरची परंपरा आहे, त्यानुसार जेवढे शक्मय होईल, तितकी छोटी मूर्ती आणावी. त्या दिवशी आपल्याला जमेल तशी पूजा करावी. त्यातही गणेश अथर्वशीर्षाचे 21 पाठ वाचावेत, किंवा कोण तेही गणपती स्तोत्र एकवीस वेळा वाचावे. इथे श्रद्धेला महत्त्व आहे. डेकोरेशन, सजावट वगैरे या बाबींना गौण स्थान आहे. पूर्वीच्या काळात सकाळी मातीची गणेशमूर्ती बनवून त्याची शास्त्राsक्त पूजा करून त्याच दिवशी सायंकाळी ती मूर्ती पाण्यात विसर्जन करीत असत. आपण हल्ली दीड दिवस, सात, पाच, अकरा दिवस गणपती ठेवतो. तो हौसेचा भाग आहे. हल्लीच्या काळाला अनुसरून कोणतेही अवडंबर न करता आपण जमेल तसे सोप्या पद्धतीने गणपती पूजन करावे. त्या दिवशी घरातील वातावरण आनंदी आणि मंगलमय ठेवावे. कारण गणपती ही मांगल्याची मूर्तीमंत देवता आहे, म्हणूनच त्याला मंगलमूर्ती असे म्हणतात. गणपती आणतांना काहीजण तो झाकून आणतात. तसेच चुकूनही करू नका आपण नेहमी ज्या पद्धतीने पूजा करतो, तशीच पूजा यावेळी करावी. सर्वत्र कोरोनाचे सावट आहे, त्यामुळे सर्व नियम पाळूनच पूजा केल्यास उत्तम ठरेल. गणपती आणताना चुकून धक्का वगैरे लागल्यास घाबरून जाऊ नये, तर ती भंगलेली मूर्ती पाण्यात विसर्जित करून नंतर नवीन मूर्ती आणून तिची प्रति÷ापना करावी. गणपती मूर्तीची प्रति÷ापना, पूजा होत नाही तोपर्यंत ती फक्त साधी मातीची मूर्ती असते. त्यात जीव नसतो, त्यामुळे घाबरून जाऊ नका. पूजा झाल्यानंतर जर अशा घटना घडल्या, तर त्याची माफी मागा. काही चुकलं तर माफ कर म्हणा. भंगलेली मूर्ती विसर्जित करा, नंतर पुन्हा गणपती आणण्याची जरुरी नाही. कोणतेही धार्मिक कार्य करताना आपल्या व्यवहारिक अडचणांकडे दुर्लक्ष करू नका. सोयरसुतक असेल तर गणपती आणू नका. एक वर्ष खंड पडल्याने त्यात काहीही बाधा येत नाही.
मेष –
पंचमअधिपती रवी बलवान असल्याने बऱयाच महत्त्वाच्या कामात मोठे यश मिळवून देईल. शिक्षणात चांगले यश मिळवाल. या काळात संतती झाल्यास ती अत्यंत चांगली व भाग्योदयकारक अशी असेल. महत्त्वाच्या कामानिमित्त प्रवास घडतील. बुद्धिमत्तेच्या कोणत्याही कामात उत्तम यश मिळवाल.
वृषभ –
संसारिक सौख्य उत्तम राहील. सरकारी कामे खोळंबली असतील, तर ती त्वरित करून घ्या. शारीरिक आजार कमी होतील. आर्थिक बाबतीत सप्ताह चांगला जाईल. मंगळ-हर्षलचा योग चांगला नाही. फोटो, पदार्थापासून जपा.
मिथुन –
लाभातील मंगळ-हर्षल हा योग नोकरीत बढतीचा लाभ होऊ शकतो, पण मित्रमंडळींकडून फसवणूक होण्याची शक्मयता. पैसा जास्त खर्च होईल. संततीशी मतभेद होऊ शकतात. एखाद्याच्या चुकीमुळे वाहनाला अपघात होऊ शकतो. त्यासाठी सावध रहा. पराक्रमी रवी अनेक महत्त्वाच्या कामात उत्साहाने यश मिळवून देईल. नातेवाईकांशी संबंध सुधारतील. जे काम हाती घ्याल, ते यशस्वी करून दाखवाल.
कर्क –
दशमातील बलशाली मंगळ हा एक प्रकारचा अत्यंत शुभ मानला जातो. ज्या क्षेत्रात असाल, त्यात नाव काढाल. नोकरी-व्यवसायात बदली, बढतीच्या संधी. ज्या काही घटना घडतील, त्या अचानक व कल्पनातीत असतील. पण वरि÷ां बरोबर कोणत्याही बाबतीत मतभेद अथवा वाकडेपणा घेऊ नका. रविचे भ्रमण लिखाणाशी संबंध असेल तर उत्तम यश मिळवून देईल.
सिंह –
राशीस्वामी रवि अत्यंत बलवान आहे. त्यामुळे अत्यंत अवघड व न होणारी कामे, ही या रवीच्या पाठबळामुळे सहज होऊ शकतात. भाग्यातील हर्षल- मंगळ हा योग स्वभावात ताठरपणा निर्माण करील. त्यामुळे काही जणांशी वाकडेपणा येण्याची शक्मयता आहे. अति लांबचे प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा, अथवा काळजीपूर्वक वाहन चालवा. गुरु-केतु युती काही अंशी शुभ असल्याने अध्यात्मिक क्षेत्रात अपेक्षेपेक्षाही अधिक उत्तम यश मिळेल. ध्यानधारणा, प्राणायाम यांची आवड असेल, तर त्याचा बराच फायदा व्यावहारिक बाबतीत होईल.
कन्या –
अष्टमातील हर्षल-मंगळ अपघातदर्शक असल्याने कोणतेही धाडसाची काम शक्मयतो करू नका, तसेच वीज, अग्नी व स्फोटक पदार्थ यापासून जेवढी काळजी घेता येईल, तेवढी घ्या. धनस्थानावर मंगळाची दृष्टी असल्याने अचानक काही खर्च निघतील. जमीन व जागेच्या कोणत्याही व्यवहारात उत्तम यश मिळेल. रवी बाराव्या स्थानी असल्याने डोळय़ांची काळजी घ्या. तसेच काही उघड शत्रू दिसल्यास त्यांच्याशी समझोता करण्याचा प्रयत्न करा. ग्रहमान उत्तम असले तरी खर्चही वाढणार आहेत, याकडे दुर्लक्ष करू नका.
तुळ –
सप्तमातील बलवान रवीमुळे विवाहाच्या वाटाघाटीत उत्तम यश मिळेल. खानदानी व श्रीमंत घराण्याशी विवाहयोग होण्याची दाट शक्मयता. प्रेम करणे, आंतरजातीय संबंध वगैरे घटनाही घडू शकतात. राशीस्वामी बुध आणि शुक्र बिघडलेला असल्याने खर्चात वाढ होणार आहे. त्यासाठी योग्य नियोजन करा.
वृश्चिक –
राशीस्वामी मंगळ, हर्षल बरोबर अत्यंत बलवान आहे. त्यामुळे शत्रूंची दाणादाण उडवाल. जे काम हाती घ्याल, ते नक्कीच पूर्ण होईल. पण कष्ट आणि नियोजन यांचे प्रमाण योग्य नसेल तर सर्व काही असूनही त्याचा फायदा होईलच असे नाही. रवि बलवान असल्याने नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करा, यश मिळू शकेल.
धनु –
काही गोष्टी आपोआप होऊ लागतील. आतापर्यंत झालेले सर्व त्रास कमी होतील, आणि हाती घेतलेल्या कामात यश मिळू लागेल. हर्षल-मंगळ पंचमात असल्याने क्रीडाक्षेत्र अथवा धाडसाच्या कोणत्याही कामात चांगले यश मिळवू शकाल. राशीस्वामी गुरु, केतूच्या सानिध्यात असल्याने मंत्र-तंत्र गूढ विद्या तसेच धार्मिकतेकडे विशेष ओढा राहील, पण त्याचा अतिरेक होणार नाही, याची काळजी घ्या. आर्थिक बाबतीत काही नव्या कल्पना लढवाव्या लागतील. त्याचा पुढे फायदा होईल.
मकर –
सुखस्थानातील हर्षल-मंगळामुळे कौटुंबिक वातावरण गरम आहे. किरकोळ गोष्टी उग्र स्वरूप धारण करण्याची शक्मयता आहे. कुटुंबातील लोकांना याची कल्पना देऊन वातावरण शांत राहील, याची दक्षता घ्या. जागेचे व्यवहार, घराची दुरुस्ती, खरेदी-विक्री, नोकरी-व्यवसाय या बाबतीत उत्तम यश मिळवाल. नोकरी, उद्योग, व्यवसाय यासाठी अनुकूल आहे, पण काही गोष्टीत तडजोड करावी लागेल. थोडेसे नुकसान झाले तरी पुढे फायदा होईल. वैवाहिक जीवनात मतभेदांना मुळीच थारा देऊ नका.
कुंभ –
रास रविचे भ्रमण वैवाहिक जोडीदाराचे वर्चस्व वाढविल, पण त्यात जो सल्ला असेल, तो मात्र योग्य असेल. हर्षल-मंगळ सर्व कामात उत्साह वाढवतील. मोठा पैसाही मिळेल, पण नातेवाईक आणि शेजारी वगैरे लोक तुमच्याविषयी आकस धरू शकतात. त्यामुळे त्यांच्यापासून काही गोष्टी दडवून ठेवणे योग्य ठरेल. राशीस्वामी बलवान आहे, त्यामुळे दीर्घ स्वरूपी कामात यश मिळवाल.
मीन –
राशीस्वामी गुरु दशमात केतुयुक्त आहे. त्यामुळे नोकरी, धंदा, व्यवसायात लक्ष कमी होऊन आध्यात्मिकतेकडे विशेष ओढा लागण्याची शक्मयता आहे. धनस्थानात हर्षल-मंगळ आर्थिक बाबतीत अनुकूल नाहीत. ध्यानीमनी नसताना अचानक मोठे खर्च होऊ शकतात. तसेच डोळय़ांची जळजळ व उष्णता विकारांचा त्रास होऊ शकतो. राविचे फेरे अनेक बाबतीत लाभदायक आहेत. मानसिक कमकुवतपणा सोडून कणखर ठेवल्यास फार मोठे यश मिळेल.