प्रतिनिधी/ बेळगाव
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर बेळगावमध्ये आल्यावेळी त्यांचे आदरातिथ्य करणाऱया कंग्राळ गल्ली येथील सिद्धव्वा मेत्री (वय 95) यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. 1939 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर बेळगावला आल्यावेळी सिद्धव्वा यांनी त्यांना आपल्या घरी निमंत्रित केले आणि त्यांच्या भोजनाची सोय केली. यामुळे संतुष्ट झालेल्या डॉ. आंबेडकर यांनी महिलांनी शिक्षण घेऊन समाजासाठी कार्यरत रहावे, असा सल्ला त्यांना दिला होता.
यामुळे प्रभावित होवून सिद्धव्वा यांनी आपल्या हयातीत आंबेडकर विचारांचा प्रसार करत त्याचे वैयक्तिक जीवनातही आचरण केले होते. सदाशिवनगर स्मशानभूमीत शुक्रवारी सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विविध दलित संघटनांचे कार्यकर्ते मल्लेश चौगुले, बसवराज, रायवगोळ, कल्लाप्पा, रामचंण्णावर, विनोद कोलकार, शंकर कांबळे यावेळी उपस्थित होते. तसेच राजू सेठ, किरण जाधव, राजू पाटील यांनी त्यांच्या घरी जावून कुटुंबीयांचे सांत्वन केले.