म्हासुर्ली / वार्ताहर
गेल्या चोवीस तासात धामणी खोऱ्यात मुसळधार पावसाने जोरदार सुरुवात केल्याने दोन महिन्यापासून पाण्याअभावी आटत चाललेल्या ओढ्या नाल्यांना पाणी झाले असून धामणी नदीला महापूर आला आहे.परिणामी नदी दुथडी भरून वाहू लागली असून नदी धोका पातळी ओलांडून वाहत आहे. तर सोसाट्याचा वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून पडल्या आहेत.तसेच उस पिके जमीनदोस्त झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच वीज पुरवठा ही सतत खंडित होत असल्याने जनतेची गैर सोय होत आहे.