नुकसान भरपाई नको मात्र उपाययोजना करा.
वाळपई प्रतिनिधी
साळींदरच्या वाढत्या प्रादुर्भावावामुळे सत्तरी तालुक्मयातील ग्रामीण भागातील लागवडी धोक्मयात आलेल्या आहेत.. आतापर्यंत रानटी जनावरांच्या माध्यमातून हैराण झालेल्या सत्तरी तालुक्मयातील शेतकरी बांधवांना आता साळींदरचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात होऊ लागलेला आहे .खास करून करून कंरझोळ,कुमठोळ आदी भागांमध्ये सांळीदर त्यांची संख्या वाढू लागल्यामुळे सदर भागातील नागरिकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
गेल्या चार दिवसापासून येथील प्रगतशील शेतकरी बातु गावडे यांच्या बागायतीमधील कणग्या सुरण दोडगी अशा प्रकारच्या बागायतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान केल्यामुळे त्याच्यासोबत गंभीर स्वरुपाची समस्या निर्माण झालेली आहे. आपण कृषी खात्याकडे नुकसान भरपाई मागत नाही तर वनखात्याच्या यंत्रणेने या गंभीर स्वरूपाच्या समस्येची दखल घेऊन या रानटी जनावरांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे .
याबाबतची माहिती अशी की गेल्या अनेक वर्षापासून सत्तरी तालुक्मयात रानटी जनावरांचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाण वाढताना दिसत आहे. आतापर्यंत गवेरेडे रानडुक्कर शेकरू माकड यांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने भासत होता. साळींदर या प्राण्याने नव्याने समस्या निर्माण केलेली असून खास करून ग्रामीण भागात याचा उपद्रव मोठय़ा प्रमाणात वाढताना दिसत आहे.
सांळीदर मुळासकट बागायती लागवड नष्ट करते.
साईंदर हा प्राणी असा आहे की तो लागवडीची मुळासकट नासाडी करून टाकतो. यासंदर्भात कंरझोळ भागांमध्ये फेरफटका मारला असता बातू गावडे यांची बागायत मोठय़ा प्रमाणात उध्वस्त करून टाकलेली आहे. काटेरी कणग्या सुरण अशा प्रकारची प्रामुख्याने नासाडी केली असून यामुळे आपल्याला जवळपास अडीच लाखांचा फटका बसल्याचे बातू गावडे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केली. गेल्या चार दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात आपल्या लागवडीचे नुकसान झाल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या भागांमध्ये रानटी जनावरांचा प्रादुर्भाव सातत्याने असतो. यामुळे आपण वेगवेगळय़ा प्रकारच्या उपाययोजना करून याप्राण्यांना थोपविण्यासाठी प्रयत्न करीत असतो. मात्र साळींदर याप्राण्याने आता जीवन हैराण करून टाकण्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी व्यक्त केली. सध्या मोठय़ा प्रमाणात आपली बागायत नष्ट झाल्यामुळे आपल्याला अडीच लाखांचा फटका बसला असून यामुळे आपल्या कुटुंबाच्ता उदरनिर्वाह समस्या निर्माण झाल्याचे त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.
नुकसान भरपाई नको मात्र उपाययोजना करा.
यापूर्वी रानटी जनावाराकडून मोठय़ा प्रमाणात नुकसान करण्यात आली. अनेकवेळा तक्रारी करून सुद्धा संबंधित वन खात्याचे अजिबात दखल घेत नाही. आता साळींदर यांच्या रूपाने नवीन स्वरूपाची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. आज आपल्याला मोठय़ा प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागलेले आहे. मात्र यासाठी आपण नुकसान भरपाई अजिबात मागणार नाही तर वनखात्याच्या यंत्रणेने या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन पाहणी करावी व या प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी उपाययोजना करावी अशा प्रकारची एकमेव मागणी असल्याचे गावडे यांनी यावेळी स्पष्ट केले .
ग्रामीण भागातील जीवन पूर्णपणे अशा प्रकारच्या लागवडीवर विसंबून आहे. रानटी जनावरांचा उपद्रव न थांबल्यास ग्रामीण भागातील नागरिकांच्या उदरनिर्वाहाची गंभीर स्वरुपाची समस्या निर्माण होणार आहे .याची दखल निदान वनखात्याने घ्यावी व यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी प्राधान्य द्यावे अशा प्रकारची मागणी बातु गावडे यांनी केलेली आहे