प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीत राज्यातील पहिले पोस्ट कोविड कौन्सिलिंग केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोरोनामुक्त झाल्यानंतरही काही रूग्णांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. अशावेळी त्यांच्यावर स्वतंत्र उपचार करता यावेत तसेच रूग्णांचे समूपदेशन करण्यासाठी नगर परिषदेच्या रूग्णालयात स्वतंत्र पोस्ट कोविड रूग्णालय सुरू करण्यात येणार आहे.
जिह्यात कोविड स्थिती समाधानकारक असल्याचे सांगत असून जिल्हा कोविड रुग्णालयात जवळपास 70 ते 75 रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे महिला रुग्णालय कोविड रुग्णासाठी केले जाईल आणि सिव्हील हॉस्पीटल हे नॉन कोविड म्हणून सुरू होईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. या बाबत जिल्हाधिकारी 8 दिवसात कार्यवाही करतील. जिल्हा रुग्णालय नॉन कोविड करण्यात येणार आहे. तत्पूर्वी ते सॅनिटाईज केले जाईल. रत्नागिरी पालिकेने सुरु केलेल्या मजगांव रोडवरील आरोग्य मंदिर येथील रुग्णालयात पोस्ट कोविड सेंटर सुरु केले जाईल. कोविड झाल्यानंतर रुग्णांना दिसणाऱया लक्षणांवरील मार्गदर्शनासाठी हे केंद्र र<ाहिल. सर्वसामान्यांना या मार्गदर्शनाची गरज आहे. राज्यातील ते पहिले रुग्णालय आहे. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, समूपदेशक, परिचारिका व इतर स्टाफ काम करणार आहे. यामुळे कोरोनामुक्तीनंतरही रूग्णांना चांगली सेवा या माध्यमातून मिळणार आहे.
ऑक्सिजन प्लांटही लवकरच कार्यान्वित
जिल्हय़ात कोरोना काळात स्वॅब सेंटर असेल वा प्लाझ्मा थेरपी सेंटर या महत्वपूर्ण निर्णयाबरोबर आता पोस्ट कोविड सेंटरची अंमलबजावणी लवकरच होणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या सुविधेत चांगली वाढ होत आहे. रत्नागिरीत ऑक्सिजन प्लांटही लवकरच कार्यान्वित होणार आहे.