वार्ताहर / म्हैसाळ
गेल्या पंधरवडयात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अगाप पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे उगवण झालेले पीक व बियाणे वाहून गेल्याने शेतकऱ्यांना परत दुबार पेरणी करणेचे संकट ओढवले आहे.
सप्टेंबर व आॅक्टेंबर मध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामतील हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली काही जागेवरच कुजून गेली परिणामी खरीप हंगाम वाया गेला . अगोदर च कर्जबाजरीपणामुळे घाईला आलेला शेतकरी परत कर्जाच्या खाईत लोटला गेला.
आता किमान रब्बी हंगाम तरी मिळेल या आशेने लवकर पेरणी केली .परंतु परतीच्या या पावसामुळे परत एकदा पेरा वाहून नेला. यामुळे परत एकदा बियाणे,खते,मजुरी बैलजोडी भाडे, ट्रॅक्टर भाडे या आर्थकदृष्टया नुकसानीला सामोरे जात दुबार पेरणी करणेचे वेळ शेतकरी वर्गावर आली आहे. केवळ निसर्गाच्या लहरीवर परत एकदा एक प्रकारचा जुगार सारखा खेळ शेतकरी शेतीवर करत आहे. यामध्ये शाळू,हरभरा,गहू, या सारखी पिकांची पेरणी करून आपले नशीब आजमात आहे असेच म्हणावे लागते!