ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सार्वजनिक वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आणि त्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने एनएफएसएच्या अंतर्गत4 कोटी 39 लाख रेशनकार्ड रद्द केली आहेत. रद्द केलेल्या रेशनकार्डच्या बदल्यात योग्य लाभार्थ्यांना नियमित रेशनकार्ड देण्यात आली आहेत.
अपात्र आणि बोगस रेशनकार्ड रद्द करण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा कार्यालयाने मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांचे रेशनकार्ड आधारशी लिंक केल्यानंतर बोगस रेशनकार्डची ओळख पटवणे शक्य झाले. त्यानंतर अपात्र रेशनकार्ड वगळून पात्र लाभार्थ्यांना नियमित रेशनकार्ड देण्यात आले.
2013 ते ऑक्टोबर 2020 पर्यंत सरकारने 4 कोटी 39 लाख रेशनकार्ड रद्द केली आहेत. सध्या 81 कोटी 35 लाख लाभार्थ्यांना अल्प दरात रेशन उपलब्ध करून दिले जाते.