वारणानगर / प्रतिनिधी
एकरकमी एफआरपी १४ दिवसांत द्यावी, मागील थकीत एफआरपीचे व्याज मिळावे, क्रमपाळीची यादी सर्व कार्यालयात प्रसिद्ध करावीयांसह अन्य मागण्यांचे निवेदन जयशिवराय किसान संघटना व आंदोलन अंकुश यांच्यावतीने येथील श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक यांना आज सोमवार दि.७ रोजी देण्यात आले.
शुगर केन कंट्रोल ऑर्डर १९६६ च्या कायद्यानुसार तोड केलेल्या ऊसाची १४ दिवसात एकरकमी एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, गेल्या वर्षी दोन टप्प्यात एफआरपी दिली आहे. त्या थकीत एफआरपीचे १५ टक्के नुसार होणारे व्याज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, मशीन तोडीच्या ऊसास ५ टक्के मोळी बांधणी वजावट शासनाचा अथवा साखर आयुक्तांचा कोणताही आदेश नसताना करत आहात ती वजावट अन्यायकारक असून ती रद्द करण्यात यावी.
फंडातून ऊसाचे वाहन कारखान्यावर आल्यानंतर आधी वजन करून नंतर नंबरात लावावे, शेतकऱ्यांच्या फडातील ऊसाच्या वाड्याचा निम्मा हिस्सा फड मालकास मिळावा यासाठी निर्णय घेऊन त्याबाबत सर्व शेती मदतनीस व स्लीप बॉय यांना आदेश द्यावेत,सर्व शेतकरी सभासदांनी ऊस लागण केल्यानंतर त्यांची नोंद घेत असता व त्याच नोंदीनुसार क्रमपाळीची यादी आपल्या शेती विभाग खात्याच्या सर्व कार्यालयात प्रसिद्ध करावी अशा मागण्याचे निवेदन या दोन्ही शेतकरी संघटनानी सयुक्त दिले आहे.
सर्व मागण्यासाठी आपण बैठक घेऊन शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत, अथवा सर्व मागण्याबद्दल निर्णय घेऊन त्याचे लेखी पत्र आम्हास द्यावे. अन्यथा आम्ही आपल्या कारखान्याकडे येणारी सर्व वाहने आम्ही अडवणार आहोत, असा इशारा देखील निवेदनात दिला आहे.
वारणानगर ता. पन्हाळा येथे वारणा कारखान्यास कार्यकारी संचालक शहाजी भगत यांना निवेदन देताना जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील,पन्हाळा तालुका अध्यक्ष बंडा पाटील, उपाध्यक्ष शिवाजी शिंदे, हातकणंगले तालुका अध्यक्ष गब्बर पाटील,कार्यकर्ते सदाशिव कुलकर्णी, शितल कांबळे, तानाजी पाटील, भैरवनाथ मगदूम, राजाराम थोरवत, सचिन कांबळे व इतर उपस्थित होते.
संघटनेने शेतकरी हिताच्या केलेल्या मागणीस कार्यकारी संचालकानी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मशीन तोडीच्या ऊसास ५ टक्के मोळी बांधणी वजावट अन्यायकारक असून ती रद्द करण्यात यावी दत्त शिरोळ कारखान्याने मोळी बांधणी कपात १ टक्के केली आहे सर्वच कारखान्याने याची अमंलबजावणी केल्यास शेतकऱ्यास प्रतिटन १२० रू. पर्यन्तचा लाभ होणार असल्याचे जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यानी सांगीतले.
शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे केलेल्या मागण्यावर संचालक मंडळात चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल तसेच मशिन ऊस तोडी संदर्भात मोळी बांधणी कपात जिल्ह्यातील सर्व कारखाने जो निर्णय घेतील त्या प्रमाणे अंमलबजावणी करण्यात येईल अशी प्रतिक्रिया वारणासह साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी भगत यांनी व्यक्त केली.
वारणानगर ता. पन्हाळा येथे वारणा कारखान्यास कार्यकारी संचालक शहाजी भगत यांना निवेदन देताना जय शिवराय किसान व आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने,कार्यकर्ते धनाजी पाटील, गब्बर पाटील, सदाशिव कुलकर्णी, शितल कांबळे, तानाजी पाटील, बंडा पाटील व इतर