पुलाची शिरोली/ वार्ताहर:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे केले आहेत. पण विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या भूलथापांना शेतकऱ्यांनी बळी पडू नये. असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. ते हातकणंगले तालुक्यातील पदाधिकारी निवड प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी किसान सभा जिल्हाध्यक्ष भगवान काटे होते.
ते पुढे म्हणाले, भाजप किसान मोर्चाचे पदाधिकाऱ्यांनी या कायद्याबाबत शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी गावोगावी फिरून जागृती निर्माण केली पाहिजे.
भगवान काटे म्हणाले, विरोधी आघाडीकडून शेतकरी हितांचे केलेले कायदे मोडीत काढण्याचे षडयंत्र विरोधकाकडून सुरू आहे. त्यास किसान मोर्चा च्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांत जागृती निर्माण करावे असे आवाहन केले प्रारंभी भाजपा किसान मोर्चा उपाध्यक्ष निवडीचे पत्र समरजित सिंह घाटगे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सतीश पाटील, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील, किसान सभेचे नाना जाधव ,संदीप पोर्लेकर, संभाजी भोसले ,किरण कौंदाडे ,उत्तम पाटील दिलीप शिरोळे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.