खानापूर / वार्ताहर
खानापूर येथील महालक्ष्मी ग्रुप संचालित लैला शुगर साखर कारखान्याच्या यावषीच्या गळीत हंगामात सोमवारपर्यंत एक लाख दहा हजार टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. त्यामुळे उत्पादित झालेल्या 1 लाख साखर पोत्यांचे पूजन संचालक मंडळ व शेतकऱयांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना एमडी सदानंद पाटील म्हणाले, लैला शुगर कारखान्याची जबाबदारी महालक्ष्मी ग्रुपने हाती घेऊन 2020-21 गळीत हंगाम यशस्वीरीत्या सुरू ठेवला आहे. सोमवारपर्यंत 1 लाख 10 हजार टन ऊस गाळप करण्यात आले आहे. यावषी कारखान्याला उसाचा 10.5 सरासरी उतारा असून 1 लाखापेक्षा अधिक साखरेचे उत्पादनही झाले आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात यावषी अतिवृष्टीमुळे उसाची वाढ झाली नाही. तसेच बऱयाच शेतीवाडीत वाहने जाण्यास अडचण झाल्याने तोडणीला विलंब होत असला तरी तालुक्मयातील शेतकऱयांनी कारखान्याला ऊस पाठवून सहकार्य करावे. यावषी कारखान्याने 4 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून शेतकऱयांनी आपला ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन एमडी सदानंद पाटील यांनी केले.
यावेळी श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर, लैला शुगर्सचे सीईओ श्री सुब्बाराजू, व्हा. प्रेसिडेंट मुरली, रघुनंदन जी, श्रीकांत कांबळेजी, यशवंत बिर्जे, मुरलीधर पाटील, विठ्ठल करंबळकर, चांगाप्पा निलजकर, सुरेश कोलकार, बाळगौडा पाटील, यल्लाप्पा तिरवीर व लैला शुगर्सचे व्यवस्थापक संचालक सदानंद पाटील, शेती अधिकारी बाळासाहेब शेलार, अभिजीत चांदीलकर आणि सर्व संचालक मंडळ व लैला शुगर्सचे कर्मचारी उपस्थित होते.
2019-2020 साली ज्या शेतकऱयांनी कारखान्याला ऊस पुरवठा केला आहे. अशा शेतकऱयांना प्रति टन अर्धा किलो 25 रुपये किलोप्रमाणे साखर 25 डिसेंबरपर्यंत देण्यात येणार आहे. याचा शेतकऱयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर यांनी यावेळी केले.
भाग्यलक्ष्मी साखर कारखान्याचे खासगीकरण झाल्यानंतर गेल्या 11 वर्षात लैला शुगर्स व्यवस्थापनाने नऊ गळीत हंगाम यशस्वी केल्यानंतर मागीलवषी तालुक्मयातील तोपिनकट्टी महालक्ष्मी ग्रुपच्या सहकार्यातून गळीताला प्रारंभ झाला आहे. महालक्ष्मी ग्रुपने कारखान्याला चालवण्याची जबाबदारी घेतल्याने तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱयांच्या आशा उंचावल्या आहेत. शेतकऱयाना ऊसाला चांगला दर मिळावा, उसाची वेळेत उचल व्हावी, अशी अपेक्षा शेतकऱयातून व्यक्त होत आहे. खानापूर तालुक्यात दरवर्षी सात ते आठ लाख टन ऊस उत्पादनाची सरासरी आहे. त्यामुळे शेतकरी वर्गानाही या कमी उत्पादनाचा चांगलाच आर्थिक फटका बसत आहे. कारखान्याकडून मिळणारा दर तसेच उत्पादनासाठी येणारा खर्च पाहता शेतकरी वर्गाला यावर्षीचा उसाचा दरही किमान 3500 रु. मिळावा, अशी मागणी आहे. पण राज्य सरकारने यावषी उसाच्या दराची कोंडी फोडली नसल्याने उसाला किती दर मिळणार याकडे शेतकऱयांचे लक्ष आहे.
जिल्हय़ातील अन्य कारखान्याच्या तालुक्मयातील ऊसाची उचल
कर्नाटकातील साखरेचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱया बेळगाव जिल्हय़ात यावर्षी ऊस उत्पादनात चांगली वाढ झाली आहे. यामुळे जिल्हय़ातील अनेक कारखान्यानी गाळपाचे उद्दीष्ठ पूर्ण करण्यासाठी एकच चढाओढ सुरु केली आहे. खानापूर तालुक्यात उसाचे उत्पादन बऱयापैकी आहे. त्यामुळे जिल्हय़ातील तब्बल 12 साखर कारखान्यांनी तालुक्यातील ऊस उचलीकडे लक्ष वेधले आहे.पण अनेक कारखान्याकडून ऊस टोळयांची कमतरता असल्याने शेतकऱयाना ऊस तोडणीची घाई झाली आहे.
लैलाला उद्दीष्ट पूतर्तेसाठी कसरत
यावषी कारखाना कार्यक्षेत्रात तसेच तालुक्मयात ऊसाचे प्रमाण अधिक आहे. कारखान्याला नियमित ऊस पुरवठा झाल्यास तालुक्यातील उसाच्या उत्पादनानुसार 3.50 लाख टन ऊस गाळप होण्याची शक्यता आहे. जिल्हय़ातील साखर कारखान्यानी लैला शुगर्स तसेच राणी शुगर्स कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उसाच्या उचलीला मोठय़ा प्रमाणात प्राधान्य दिल्याने लैला शुगर्सला तसेच राणी शुगर्सला गाळपाचे उद्दीष्ठ साध्य करण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे. लैला शुगर्स साखर कारखान्यानी यावर्षी 4 लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ठ ठेवले आहे. पण ऊस टोळय़ांची कमतरता असल्याने हे उद्दीष्ट पूर्ण करणे बरेच कठीण जाणार आहे.