लागवडीपैकी 90 टक्के रोपांची योग्यप्रकारे वाढ
प्रतिनिधी / बेळगाव
वनखाते अधिक वृक्ष लागवड करून वनक्षेत्र वाढविण्याबरोबरच वनक्षेत्र समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पावसाळय़ात म्हणजे जून, जुलैदरम्यान तालुक्मयातील विविध मार्गांवर तब्बल 18 हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे. लागवड केलेल्या वृक्षांपैकी 90 टक्के वृक्ष चांगल्या प्रकारे टिकून आहेत. त्यामुळे वनखात्याचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य होताना दिसत आहे.
भविष्यात होणारे प्रदूषण टाळण्यासाठी व पावसाचा नियमित समतोल राखण्यासाठी वृक्षरोपणाची प्रभावी मोहीम वनखात्याने हाती घेतली आहे. खाते वृक्षांचे संवर्धन व जतन व्हावे यासाठी पावसाळय़ात वृक्षारोपणाला महत्त्व देते. नष्ट झालेल्या झाडांच्या ठिकाणी नवीन झाडे लावून वृक्षांची संख्या वाढविली जात आहे. शिवाय नागरिकांना उपयुक्त अशा आंबा, फणस, कडीपत्ता, चिकू, लिंबू, नारळ अशा विविध प्रकारच्या रोपांना प्राध्यान्य देण्यात येत आहे. पावसाळय़ात लागवड केलेल्या व सुस्थितीत असलेल्या रोपांना पाणी घालण्याबरोबरच झाडांभोवती कूंपण घालण्याचे काम वनखात्यामार्फत सुरू आहे.
तालुक्मयातील हिंडलगा, अगसगा, हंदिगनूर, केदनूर, बेनकनहळ्ळी, येळ्ळूर, के. के. कोप्प, मारीहाळ, करडीगुद्दी, काकती, होनगा, देसूर, संतिबस्तवाड आदी भागातील खुल्या जागा, गायरान भाग, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, स्मशानभूमी व संपर्क रस्त्यांशेजारी रोप लागवड करण्यात आली आहे.
विशेषकरून फणस, जांभूळ, आंबा, पिंपळ, कडीपत्ता, ताड, बेहडा, निम, बदाम आदी जातींच्या रोपांचा यामध्ये समावेश आहे. वनखात्याच्या रोपवाटिकेत विविध प्रकारची रोपे तयार करून ही रोपे लावण्यात आली आहेत. ही झाडे भविष्यात पर्यावरण व निसर्ग वाचविण्यासाठी उपयोगी पडणार असून खात्याबरोबरच नागरिकांनीही रोपे जतन करणे गरजेचे आहे.
धडपड…
- वृक्षांना पाणी-कूंपण घालण्याचे काम हाती
- वनक्षेत्र वाढविण्यासाठी धडपड