पुलाची शिरोली / वार्ताहर
सोमवारी पहाटेपासून पावसाच्या तुरळक सरीमुळे शेतकरी व मजूर हवालदिल झाले आहेत. तर सायंकाळी पावसाचा जोर वाढल्याने ऊस तोडणी पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत.यामुळे शेतकऱ्यांची झोपच उडाली आहे. रविवार पासुन वातावरणात अमुलाग्र बदल झाला होता.
परिणामी सोमवारी पहाटे पावसाच्या तुरळक सरी पडण्यास सुरुवात झाली होती. यामुळे शेतात तोडून टाकलेला ऊस नेण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली. तर सायंकाळी सहा वाजता पावसाला सुरुवात झाली. यामुळे शेतात चिखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे साखर कारखाना मजूरांची ऊसतोडणी बंद पडली आहे.परिणामी शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत पडला आहे.तसेच पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.