वार्ताहर/ हुक्केरी
नुकताच ग्राम पंचायत निवडणुकीचा निकाल लागला आहे. काही ग्रा. पं. मध्ये दाम्पत्य तर काही ग्रा. पं. मध्ये माय-लेकाने विजय मिळविला आहे. हुक्केरी तालुक्यातील कोटबागी ग्राम पंचायतीमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची निवड झाली आहे. कुटुंबप्रमुख अव्वण्णा पाटील यांनी ग्रा. पं. मधून तिसऱयांदा विजय मिळविला आहे. तर त्यांची पत्नी माला पाटील या दुसऱयांदा विजयी झाल्या आहेत. त्यांच्याच कुटुंबातील रेणुका पाटील याही दुसऱयांदा निवडून आल्या आहेत. यामुळे एकाच कुटुंबातील तिघे जण निवडून आल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील पहिलीच आहे. यामुळे याची तालुक्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे.