प्रतिनिधी/ रत्नागिरी
मागील काही दिवसांपासून जिह्यात पडणाऱया थंडीमुळे आंबा, काजू बागायतदारांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत़ मागील वर्षी कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जिह्यातील फळ बागायतदारांना आर्थिक नुकसानीला समोर जावे लागले होत़े मात्र यावर्षी मोहोर येण्याच्या काळात थंडी पडल्याने बागायतदार सुखावले आहेत़ दरम्यान हवामाना खात्याच्या अंदाजानुसार 30 जानेवारीपर्यत थंडी कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आह़े
कोकणात आंबा, काजू, फणस यांचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन घेतले जात़े यावर्षी डिसेंबर महिन्यात थंडीने पाठ फिरवल्यामुळे बागायतदार चिंतेत सापडला होत़ा त्यामुळे यावर्षीही व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होत़ी मात्र जानेवारी महिन्याच्या सुरूवातीपासूनच थंडी पडल्याने आंबा, काजूची झाडे बहरू लागली आहेत. हवामाना खात्याच्या अंदाजानुसार, 30 जानेवारीपर्यत थंडी कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आह़े हापूस आंब्याचा विचार करता चांगल्या प्रकारे मोहोर येण्यासाठी चांगली थंडी असणे आवश्यक आह़े जर थंडी पडली नाही तर मोहोर उशीरा येथे अथवा कमी येत़ो त्यामुळे शेतकऱयांना नुकसानीला समोर जावे लागत़े थंडीबरोबरच पाण्याचा ताणही तितकाच महत्वाचा ठरत असत़ो उशीरा पडलेल्या पावसामुळे आंबा, काजूच्या फळाचे नुकसान होत़े
आंबा बागायतदार सुखावले कोकणामध्ये समुद्रालगत असलेल्या आंबा बागा उत्पन्नाच्या दृष्टीने आघाडीवर असतात़ याला कारण म्हणजे समुद्रातून येणारा खारा वारा हा आपल्यासोबत क्षारांचे कण घेवून येत़ो हे क्षार आंब्याच्या झाडावर पानांवर पडतात आणि त्यामुळे एक प्रकारचा ताण या झाडांना मिळतो आणि आंब्याचा मोहोर येण्यास मदत होत़े हा मोहोर येण्यावर बदलत्या हवामानाचा परिणाम होत असत़ो थंडीचे वातावरण मोहोर येण्यासाठी अत्यंत उपयुक्त असेच मानले जात़े त्यामुळे सध्या जिह्यामध्ये पडत असलेल्या थंडीमुळे आंबा बागायतदार सुखावले आहेत़