प्रतिनिधी / विटा
स्वच्छतेची चळवळ ही जोपर्यंत लोकचळवळ होत नाही, तोपर्यंत शाश्वत विकास साधता येत नाही. लोकांमध्ये पर्यावरण विषयक जागरूकता येण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी विटा शहर आणि नगरपरिषदेच्या विविध उपक्रमांची पाहणी केली. यावेळी नगरपालिकेत 2 लाख 90 हजार रुपये किंमतीच्या एअर पुरीफायरचे लोकार्पण करण्यात आले. नगरपालिका आवारात इ-बाईक, कंपोस्ट खते, बुक बँक या उपक्रमांची पाहणी केली. यावेळी मुख्याधिकारी अतुल पाटील, नगरसेवक दहावीर शितोळे, संजय तारळेकर, सचिन शितोळे, प्रशांत कांबळे, अविनाश चोथे, फिरोज तांबोळी आणि पदाधिकारी उपस्थित होते.