शेतकरी व संस्थाचालक त्यांच्यात भीतीचे वातावरण, चोराचा तपास लागणार कधी हा प्रश्न कायम अनुत्तरितच
वार्ताहर / कुंभोज
हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील वारणा नदी शेजारी असणाऱ्या जॅकवेल परिसरातील शेतकरी अनिल शांतगोंड पाटील यांच्या शेतातील अडीशे फुट मोटर केबल अज्ञात चोरट्यांनी रात्री तोडुन नेली. तसेच अनिल जनगोडा पाटील यांच्या शेतातील विहिरीवरील दोनशे फूट केबल अज्ञात चोरट्यांनी तोडून चोरून नेली आहे. त्याची साधारण किंमत आठ हाजार असून वारणा नदी पुला शेजारील पाणी पुरवठा संस्था व खाजगी पाणीपुरवठा शेतकरी यांची केबल चोरीचे प्रमाण गेल्या दोन-तीन वर्षात वाढले असून याबाबत हातकलंगले पोलिसात वारंवार तक्रार करूनही अद्याप त्याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
परिणामी काही वेळा काही संस्थांनी केबल चोरी करणाऱ्या चोरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांत कायदा व सुव्यवस्था याबद्दल संभ्रमावस्था निर्माण झाली असून प्रतिवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या नदीकाठावरील ह्या चोरीच्या प्रकाराला शेतकरी व पाणीपुरवठा संस्थाचालक कंटाळले असून कायदा व सुव्यवस्थेत शेतकऱ्यांना कोठेतरी ज्ञाय मिळावा शेतकऱ्यांची होणारी गळचेपी थांबवावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
परिणामी प्रत्येकवर्षी लाखो रुपयाच्या केबल चोरीला जाते त्याबाबतीत गुन्हाही नोंद केला जातो परंतु त्याचा तपास मात्र होत नाही, याचे गोड बगाल काय, पोलिसांच्या मनात चोरांच्या बद्दल धास्ती आहे का? की जाणीवपूर्वक शेतकरी वर्गाकडे दुर्लक्ष केले जात आहे. असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित होत आहे.